मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर प्रचाराला आता जोर आला आहे. तीन टप्प्यांतील मतदान पार पडले असून पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यात मुंबईत मतदान होणार आहे. त्यादृष्टीने आधीच राजकीय पक्षांनी प्रचारासाठी योजनांची आखणी केली होती. प्रचाराकरता शिवाजी पार्कवर (Shivaji Park) १७ मे रोजी सभा घेण्यासाठी मनसे (MNS) व ठाकरे गट (Thackeray Group) या दोघांनीही अर्ज केले होते. मात्र, ठाकरे गटाला मागे सारत शिवाजी पार्कसाठी मनसेने बाजी मारली आहे. यानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) व पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पहिल्यांदाच एकाच मंचावर येणार आहेत.
मनसेने महायुतीच्या प्रचारासाठी १७ मे ला शिवतीर्थावर जाहीर सभेचं आयोजन केलं आहे. यावर मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, निवडणूक जाहीर झाली त्यावेळी सर्वप्रथम आमचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी परवानगीसाठी पत्र दिलं होतं. महापालिका व निवडणूक आयोगाचा नियम आहे की, ज्याची मागणी पहिली असते त्याला पहिलं प्राधान्य दिलं जातं, त्याप्रमाणे आम्हाला सभेची परवानगी मिळाली आहे. सभेच्या निमित्ताने राज ठाकरे व पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र मंचावर येणार असल्याने मुंबईकरांसाठी भाषणाची व विचार ऐकण्याची ही पर्वणी असेल, असंही संदीप देशपांडे म्हणाले.
मुंबईत २० मे रोजी मतदान पार पडणार आहे. त्यामुळे ३ दिवस आधी होणारी ही सभा प्रचाराच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणार आहे. या सभेत नेमके काय विचार मांडले जाणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
जाणून घ्या देशात किती टक्के मतदान? मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksbaha Election) पाचव्या टप्प्यात देशातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) राज्यात आज पाचव्या…
मुंबई: जिओ आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक रेंजमध्ये डेटा प्लान सादर करत असते. काहींना महिन्याभराची…
मुंबई: मध आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. मधामध्ये व्हिटामिन, मिनरल्स आणि अँटीव्हायरल गुण आढळतात. उन्हाळ्यात…
मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…
मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…