RBI : आरबीआयची नवी नियमावली; कर्ज वाटपासंदर्भात कडक सूचना जाहीर!

Share

कॅश लोनवर असणार ‘हे’ नवे नियम; जाणून घ्या सविस्तर माहिती

मुंबई : नवे आर्थिक वर्ष सुरु होताच अनेक बँकांनी नवी नियमावली जाहीर केली होती. भारतीय रिझर्व्ह बँकेत (आरबीआय) सातत्याने नवे नियम होत असताना आता आरबीआयने कर्जाच्या मर्यादेबाबत एक नवीन अलर्ट जारी केला आहे. यामध्ये आरबीआयने नॉन-फायनान्शियल बँकिंग कंपन्यांना म्हणजे NBFC संस्थांना रोख कर्ज मर्यादेबाबतचे काही नियम पाळण्यास सांगितले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरबीआय आता आयकर कायद्यातील हा नियम आणखी कठोर करण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. NBFC कंपन्यांना धोका पत्करावा लागू नये तसेच नियमांकडे दुर्लक्ष केले जाऊ नये यासाठी आरबीआयने ही कठीण पाऊले घेतली आहेत. त्याचबरोबर IIFL फायनान्स या एनबीएफसी कंपनीवर अनेक नियमांचे उल्लंघन केलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर आरबीआयने नवीन सूचना जारी केल्या आहेत.

कॅश लोनवर आरबीआयची मर्यादा

आरबीआयने नॉन-बँकिंग वित्तीय कंपन्यांना पत्र लिहित, नियमानुसार २०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख कर्ज कोणत्याही ग्राहकाला देता येणार नाही अशी माहिती दिली आहे. अशा परिस्थितीत, कोणत्याही NBFC ने कर्जाची रक्कम २०,००० रुपयांपेक्षा जास्त रोख न देण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

IIFL फायनान्सवर कारवाई

गोल्ड लोन ऑपरेशन्स IIFL फायनान्सच्या व्यवसायात महत्त्वपूर्ण योगदान देते. मात्र व्यवस्थापनातील मोठ्या त्रुटींमुळे नव्या ग्राहकांसाठी त्यांचे सोने कर्ज ऑपरेशन त्वरित थांबवण्याचे आदेश केंद्रीय बँकेने IIFL फायनान्सला दिले होते.या फायनान्स कंपनीने सोन्याची शुद्धता आणि वजनाची अपुरी तपासणी, जास्त रोखीने कर्ज देणे, मानक लिलाव प्रक्रियेपासून विचलन आणि ग्राहक खात्यावरील शुल्कामध्ये पारदर्शकता नसणे यासारख्या नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आरबीआयने या फायनान्सवर कारवाई केली आहे.

Recent Posts

IPL 2024: प्लेऑफचे सामने कुठे आणि कधी रंगणार? कोणत्या संघामध्ये होणार सामना घ्या जाणून

मुंबई: राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील सामना रद्द होण्यासोबतच आयपीएलच्या लीग सामन्यांची सांगता…

1 hour ago

Lok Sabha Election 2024: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरूवात, अनेक दिग्गज मैदानात

मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४च्या पाचव्या टप्प्यात आठ राज्यातील ४९ जागांवर आज मतदान होत आहे. सकाळी…

2 hours ago

‘आरटीई’अंतर्गत शाळा प्रवेशाची प्रक्रिया मुंबईत सुरू

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ साठी ‘शिक्षण हक्क अधिनियम’ अर्थात ‘आरटीई’अंतर्गत २५ टक्के आरक्षित जागांसाठीच्या…

16 hours ago

मलाच मुख्यमंत्री बनवा अन्यथा मातोश्रीतले बिंग फोडेन!

संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायचे होते, त्यासाठी उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल केल्याचा आमदार नितेश राणे यांचा…

16 hours ago

Lok Sabha Election : राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत चेंगराचेंगरी

दोन्ही नेते भाषण न करता निघून गेले फुलपूर : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) पार्श्वभूमीवर…

17 hours ago

Cloudburst : अरे बाप रे! मे महिन्यात इतका पाऊस कसा झाला? हवामान विभागालाही पडला प्रश्न

चिपळूणात ढगफुटी, अडरे गावात अर्ध्या तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या चिपळूण :…

17 hours ago