Thursday, April 24, 2025
Homeब्रेकिंग न्यूजLoad shedding : उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली! भारनियमन होणार का?

Load shedding : उकाड्यामुळे विजेची मागणी वाढली! भारनियमन होणार का?

मुंबईचा वीज वापर ‘४००० मेगावॅट’ पार!

तर राज्यभरात ३०,९२१ मेगावॅटची विक्रमी मागणी

मुंबई : राज्यातील उष्णतेच्या झळा वाढताच वीजवापरातही मोठी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्राची वीज मागणी ३०,९२१ मेगावॅट इतकी विक्रमी नोंदवली गेली. त्याच दिवशी केवळ मुंबई शहराचा वीज वापर ४,०५५ मेगावॅटवर पोहोचला.

मुंबईत अडाणी इलेक्ट्रिसिटी, टाटा पॉवर आणि बेस्ट या कंपन्यांनी वाढती मागणी लक्षात घेता विशेष व्यवस्था आखली असून, नागरिकांना वीज बचतीचे आवाहन वीज कंपन्यांनी केले आहे.

चीनमध्ये ‘गोल्ड एटीएम’चा धुमाकूळ; आता एटीएमद्वारे सोने द्या, पैसे घ्या!

राज्यभरात वीज पुरवणाऱ्या महावितरणची (MSEDCL) मागणी २६,८६७ मेगावॅट इतकी झाली. याआधी १३ मार्च रोजी २७,१२६ मेगावॅटची मागणी झाली होती, ती यंदाच्या हंगामातील सर्वोच्च नोंद आहे.

वाढत्या वीज वापरामुळे भारनियमनाची शक्यता सध्या तरी नाही, मात्र नागरिकांनी शक्यतो विजेचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -