मुंबई : देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकी इंडियाने आपल्या गाड्यांच्या पोर्टफोलिओच्या किंमती अपडेच करण्याची घोषणा केली आहे. हे वर्षात तिसऱ्यांदा घडत आहे की कंपनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ करत आहे. कंपनीने आगामी ८ एप्रिल २०२५ पासून आपल्या अनेक कार मॉडेलच्या किंमतीमध्ये वाढीची घोषणा केली आहे. मारूती वॅगन आर पासून ते ग्राँड व्हिटारापर्यंत सर्व मॉडेलच्या किंमतीमध्ये २५०० रूपयांपासून ते ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ केली आहे.
कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारुती सुझुकीच्या विविध मॉडेलसाठी येणारा खर्च तसेच ऑपरेशनल खर्चामुळे गाड्यांच्या किंमतीमध्ये वाढ करणे गरजेचे झाले. इनपुट कॉस्ट आणि कच्च्या मालाच्या किंमतीमुळे ही वाढ केल्याचे सांगितले जात आहे.
किती वाढणार किंमत?
मारुती सुझुकीच्या माहितीनुसार, किंमतीमधील वाढ ही विविध मॉडेलवर अवलंबून असणार आहे. कंपनीची प्रसिद्ध एसयूव्ही ग्रँड व्हिटाराच्या किंमतीत ६२ हजार रूपयांपर्यंत वाढ होईल. तर कंपनीची स्वस्त व्हॅन मारुती इकोमध्ये २२ ५०० रूपयांची वाढ होईल. मारूतीच्या वॅगन आरच्या किंमतीत १४ हजार रूपयांपर्यंत वाढ केली जाईल. याशिवाय मल्टी पर्पज व्हेईकल एक्सएल६ आणि अर्टिगा यांच्या किंमती १२५०० रूपयांपर्यंत वाढतील.
भारतीयांची आवडती कार Wagon R…
गेल्या आर्थिक वर्षात मारुती सुझुकी वॅगनआर देशातील सर्वाधिक विक्रीची कार ठरली आहे. कंपनीने या आर्थिक वर्षात या कारच्या १,९८,४५१ युनिटची विक्री केली. कंपनीचा दावा आहे की गेल्या चार आर्थिक वर्षांपासून ही कार सातत्याने बेस्ट सेलिंग कार ठरत आहे.