आंतरजातीय विवाह केलेल्या ४३४ जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा

Share

नाशिक (प्रतिनिधी) : आंतरजातीय विवाह केलेल्या आणि योजनेच्या चौकटीस पात्र ठरणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून अनुदान प्राप्त होत असते. परंतु शासन स्तरावरून अनुदानाची रक्कम स्थानिक स्तरावर प्राप्त होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून अनेक जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर १३० जोडप्यांना समाज कल्याण विभागातर्फे ६५ लाख अनुदानाचे वाटप करण्यात आले असले तरी अजुनही ४३४ जोडप्यांना अनुदानाची प्रतीक्षा कायम आहे.

आंतरजातीय विवाह करणाऱ्या पात्र जोडप्यांना समाज कल्याण विभागातर्फे ५० हजार रुपये अनुदान दिले जाते. त्यांचा संसार थाटण्यासाठी मदत म्हणून ही रक्कम दिली जात असते. हे अनुदान मिळविण्यासाठी विवाहबद्ध दांपत्यापैकी एक व्यक्ती अनुसूचित जाती, जमातीतील असणे बंधनकारक आहे. आवश्यक कागदपत्रांसह समाज कल्याण विभागाकडे अर्ज केल्यानंतर अनुदान दिले जाते. परंतु गेल्या दोन वर्षांपासून अनुदानाची रक्कम प्राप्त होण्यास अनेक अडचणी उद्भवत होत्या. मात्र दिवाळीत शासनाकडून ६५ लाखांचे अनुदान प्राप्त झाले असून, १३० जोडप्यांना त्याचे वाटप करण्यात आले. त्यात २०१९-२० मधील ५३, २०२०-२१ मधील ७७ जोडप्यांचा समावेश आहे.

१३० दाम्पत्यांना अनुदानरूपी दिवाळीची भेट मिळालेली असली तरीही, २०२०-२१ मध्ये दाखल ७४, आणि २०२१-२२ मध्ये दाखल २३० यांसह सध्याच्या आर्थिक वर्षात दाखल १३० अशा ४३४ जोडप्यांना अद्यापही अनुदान रकमेची प्रतीक्षा आहे. याबाबत शासन स्तरावर अनुदानाची मागणी नोंदविली असून, रक्कम प्राप्त होताच अनुदानाचे वितरण केले जाणार असल्याचे अधिकारी वर्गाकडून सांगण्यात येत आहे.

Recent Posts

RCB vs PBKS: बंगळुरुचा ‘विराट’ विजय, ६० धावांच्या फरकाने पंजाबला चारली धुळ…

RCB vs PBKS: पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात पंजाबचा कर्णधार सॅम करनने टॉस…

55 mins ago

पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे १७ मे रोजी एकाच मंचावर

महायुतीची समारोपाची सभा शिवाजी पार्कवर मुंबई : दादर येथील शिवाजी पार्क मैदानावर १७ मे रोजी…

3 hours ago

२०२४मध्ये अयोध्या, लक्षद्वीपला पर्यटकांची पसंती वाढली

मुंबई: टूरिज्म कंपनी मेक माय ट्रिपने बुधवारी जारी केलेल्या एका रिपोर्टवरून ही माहिती समोर आली…

3 hours ago

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करू नका या चुका, लक्ष्मी माता होईल नाराज

मुंबई: या वर्षी अक्षय्य तृतीया १० मेला साजरी केली जात आहे. हिंदू पंचागानुसार वैशाख महिन्याच्या…

4 hours ago

देशाला दुसऱ्या फाळणीकडे नेण्याच्या काँग्रेसच्या षडयंत्रात ‘उबाठा’ ही सहभागी; भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा हल्लाबोल

मुंबई : हिंदु समाजातील उपेक्षित, वंचितांना संविधानाने दिलेले आरक्षण काढून घेऊन मुस्लिमांना बहाल करणे, मुस्लिम…

5 hours ago

पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार : एस जयशंकर

नवी दिल्ली : '३७० कलम हटवलं, पाकव्याप्त काश्मीरदेखील परत आणणार'अशी ग्वाही परराष्ट्रमंत्री एस.जयशंकर यांनी दिल्ली…

5 hours ago