Friday, August 28, 2026

Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

Election Commission of India : मतदार यादीतून नाव वगळले का?

येत्या ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत पुन्हा नाव नोंदणीची संधी

मुंबई : भारत निवडणूक आयोगाकडून १९ ऑगस्ट २०२६ रोजी मतदार याद्यांचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने सुधारित वेळापत्रक प्राप्त झाले आहे. त्‍यानुसार, मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यांतर्गत सर्व विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांच्या सुसुत्रीकरणाच्या प्रस्तावास भारत निवडणूक आयोगाने २४ ऑगस्ट २०२६ रोजी मान्यता दिली आहे. तसेच, ३१ ऑगस्‍ट २०२६ रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत प्रारुप मतदार यादीवर दावे व हरकती संबंधित विधानसभा मतदारसंघ कार्यालयात स्विकारण्यात येतील. विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालयाच्या पत्त्याची यादी महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://www.mcgm.gov.in >> नवीन >> विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम - २०२६ >> दावे व हरकती >> विधानसभा मतदारसंघनिहाय कार्यालय पत्त्याची यादी या पथदर्शकान्वये प्रसिध्द करण्यात आली आहे.

३१ ऑगस्‍ट २०२६ ते २९ ऑक्‍टोबर २०२६ या कालावधीत Unmapped मतदार, Anomalies असलेले मतदार व ज्यांनी दावे व हरकती दाखल केले आहेत अशा मतदारांना संबंधित मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयामार्फत नोटीस बजावून त्याअनुषंगाने सुनावणीद्वारे दावे व हरकती निकाली काढण्यात येतील.तसेच, ४ नोव्‍हेंबर २०२६ रोजी अंतिम मतदार याद्यांची प्रसिध्दी केली जाणार आहे.

१ ऑक्‍टोबर २०२६ रोजी ज्यांचा वयाची १८ वर्ष पूर्ण होणार आहेत असे मतदार दिनांक ३१ ऑगस्‍ट २०२६ ते ३० सप्‍टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरुन व आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन मतदार यादीत नावे नोंदवू शकतात.

ज्या मतदारांची नावे प्रारुप मतदार यादीत समाविष्ट नाहीत अथवा मतदार यादीतून वगळली गेली आहेत असे मतदार ३१ ऑगस्ट २०२६ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नमुना ६ (नवीन मतदारांसाठीचा अर्जाचा नमुना) भरून व आवश्यक ती कागदपत्रे सादर करुन मतदार यादीत नावे नोंदवू शकतात,असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >