Kala Ghoda : काळा घोडा परिसराच्या आता दुसऱ्या टप्प्यात होणार सुशोभिकरण

महापलिकेच्यावतीने ९.२३ कोटींची निविदा जारी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) : काळा घोडा परिसर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याला मिळालेल्या यशानंतर महापालिकेने मंगळवारी टप्पा २अ साठी ९ कोटी २३ लाख रुपयांची निविदा काढली. या टप्प्यात काळा घोडा परिसरातील चार रस्त्यांचे रस्ते, पदपथ, जलनिस्सारण व्यवस्था, सुशोभीकरण आणि पथदिव्यांशी संबंधित कामे करण्यात येणार आहेत. या टप्प्यात चेंबर ऑफ कॉमर्स लेन, फोर्ब्स स्ट्रीट, नागीनदास मास्टर रोड आणि नानीक मोटवानी रोड या चार रस्त्यांचा समावेश आहे.



काळा घोडा परिसर विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यंदाच्या जुलै महिन्यात झाले. या टप्प्यात व्ही. बी. गांधी मार्ग (फोर्ब्स स्ट्रीट), रोपवॉक लेन, साईबाबा रोड, रदरफर्ड स्ट्रीट आणि बी. भरुचा रोड यांचा पादचारीस्नेही पद्धतीने विकास करण्यात आला. या रस्त्यांवर सुधारित प्रकाशव्यवस्था, खुल्या जागेतील कॅफेची आसनव्यवस्था आणि सुशोभित सार्वजनिक जागा निर्माण करण्यात आल्या आहेत.


या सुशोभिकरणाच्या टप्पा २अ अंतर्गत आता आणखी काही रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. यामध्ये बेसाल्ट आणि ग्रॅनाइटच्या कोब्बलस्टोनचा वापर करण्यात येणार आहे. तसेच हे रस्ते शनिवार-रविवारी केवळ पादचाऱ्यांसाठी खुले ठेवण्याबाबत मुंबई वाहतूक पोलिसांशी समन्वय साधण्यात आला असल्याची माहिती भाजप नगरसेवक ऍड मकरंद नार्वेकर यांनी दिली आहे.


रस्ते कामांसह विविध सुविधा


टप्पा २अ मध्ये रस्ते विकासाची विविध कामे केली जाणार आहेत. यामध्ये कामाच्या ठिकाणाची साफसफाई, तात्पुरत्या संरचना हटविणे, आवश्यक सेवांच्या वाहिन्या तसेच पथदिवे, वाहतूक सिग्नल आणि रस्त्यावरील दिशादर्शक फलक यांचे स्थलांतर करणे, उत्खनन करणे आणि रस्त्याचे विविध थर बांधणे आदी कामांचा समावेश आहे.


टप्पा २ब मध्ये भूमिगत वाहनतळ, पादचारी चौक


काळा घोडा प्रकल्पाच्या टप्पा २बमधील प्रस्तावित कामांची माहिती देताना नार्वेकर म्हणाले, प्रकल्पाच्या पुढील टप्प्यात काळा घोडा जंक्शन येथे भूमिगत वाहनतळ उभारण्यासोबतच पादचारी चौकाची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या नेतृत्वाखाली कुलाबा आणि परिसराच्या सुशोभीकरणासाठी तसेच पर्यटनाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आल्याचेही मकरंद नार्वेकर यांनी सांगितले. काळा घोडा प्रकल्प आणि रिगल जंक्शन सुशोभीकरण प्रकल्प हे कुलाब्याच्या एकूण पादचारीकरणाचा भाग आहेत. रहिवाशांचे जीवनमान सुधारण्यासोबतच परिसरात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी कुलाब्यात अशा पादचारीस्नेही सुधारणा आवश्यक आहेत, असे मकरंद नार्वेकर म्हणाले.

Comments
Add Comment

Mumbai Garbage-Free : पुढील चार वर्षांत मुंबई कचरापेट्या मुक्त?

- सार्वजनिक कचरा पेट्या हटवून घरोघरी कचरा उचलण्यावर दिला जाणार भर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबईतील कचरा

Raksha Bandhan : दिव्यांग विद्यार्थ्यांनी बनवलेल्या २ हजारांहून राख्यांची विक्री

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : रक्षाबंधनाच्या निमित्ताने आपल्या कल्पकतेने आणि स्वहस्ते साकारलेल्या राख्या घेऊन

Mumbai Hawkers QR Code ID Card : क्यु आर कोड ओळखपत्रानंतरही फेरीवाले चिंतेत

- रेल्वेस्थानकासह काही भाग मोकळे सोडून व्यवसाय करण्यास मुभा,तरीही कारवाईची टांगती तलवार मुंबई (विशेष

Mumbai Auto-Taxi Fare : रिक्षा-टॅक्सी प्रवास महागणार! मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा झळ; 1 सप्टेंबरपासून नवे दर लागू होणार

मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या मुंबईकरांच्या खिशावर आता रिक्षा आणि टॅक्सी भाडेवाढीचा भार पडणार आहे. 1

Mumbai Metro 7A : MMRDA चा अजब कारभार! २६० कोटींचा मेट्रो पूल आता पाडणार? २.५ मीटरच्या उंचीने काम अडचणीत

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (MMRDA) मेट्रो प्रकल्पासंदर्भात एक धक्कादायक बाब समोर आली आहे.

Food Poisoning : बापरे! चटपटी चटणी आणि गरमागरम मोमोज खाल्ले अन् 16 जण थेट रुग्णालयात पोहचले

मुंबई : मुंबईतील कुर्ला पश्चिमेकडील सुंदरबाग परिसरात रस्त्यावरील स्टॉलवरून मोमोज खाल्ल्यानंतर 16 जणांना