मुंबई : भायखळा येथील ऐतिहासिक आणि दाट वस्तीच्या उमरखाडी परिसराचा समूह पुनर्विकास करण्याचा अत्यंत महत्त्वाचा निर्णय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाने घेतला आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांतर्गत आतापर्यंत केवळ १८० चौरस फुटांच्या अरुंद घरात कष्टाने आयुष्य काढणाऱ्या स्थानिक रहिवाशांना थेट ५०० चौरस फुटांची प्रशस्त आणि आधुनिक घरे मिळणार आहेत. या वृत्तामुळे परिसरातील तब्बल दोन हजारांहून अधिक रहिवाशांच्या चेहऱ्यावर आनंदाची लकेर उमटली आहे.
Nashik : प्रेयसीचा रुसवा घालवण्यासाठी नाशिकमधील एका तरुणाने चक्क कॉलेजसमोर मोठा ‘सॉरी’चा बॅनर लावल्याचा प्रकार समोर आला आहे. मात्र, प्रेयसीची माफी ...
पूर्वी हा संपूर्ण पुनर्विकास बांधकाम आणि विकास संस्था (कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी, सी अँड डी) प्रारूपाद्वारे राबविण्याचे निश्चित करण्यात आले होते. मात्र, रहिवाशांच्या हिताचा विचार करून आता म्हाडाने हे प्रारूप बदलले असून, बीडीडी चाळींच्या धर्तीवर कंत्राटदार नियुक्त करून दुरुस्ती मंडळ स्वतः हा प्रकल्प ताकदीने मार्गी लावणार आहे. उमरखाडी परिसरातील ६.२३ एकराच्या क्षेत्रामध्ये उपकरप्राप्त आणि पीएमजीपी अशा एकूण ८१ जुन्या व जीर्ण इमारती मोडकळीस आल्या आहेत. येथील १,९२८ निवासी कुटुंबे अनेक दशकांपासून पुनर्विकासाच्या प्रतीक्षेत होती.
नवी दिल्ली : भारताच्या संरक्षण क्षमतेला अधिक मजबूत करण्यासाठी मोदी सरकारने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी ...
हा भव्य प्रकल्प अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने दोन टप्प्यांत पूर्ण केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पहिल्या ३६ इमारतींच्या पुनर्विकासाचा सविस्तर प्रस्ताव म्हाडाच्या दुरुस्ती मंडळाकडून अधिकृतपणे राज्य सरकारच्या गृहनिर्माण विभागाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात आला आहे. उरलेल्या इमारतींच्या दुसऱ्या टप्प्याचा प्रस्तावही लवकरच तयार केला जात आहे. या संपूर्ण समूह पुनर्विकासाच्या माध्यमातून मूळ रहिवाशांच्या पुनरवसनानंतरही म्हाडाच्या तिजोरीत अतिरिक्त क्षेत्राची मोठी भर पडणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकल्पांतर्गत मंडळाला अंदाजे साडेसात लाख चौरस फुटांचे अवाढव्य अतिरिक्त क्षेत्र उपलब्ध होणार असून, येथील अतिरिक्त घरे भविष्यात म्हाडाच्या लॉटरी सोडतीद्वारे सर्वसामान्यांना विक्रीसाठी खुली केली जाणार आहेत.
नवी दिल्ली : अभिनेत्री कृती सॅनॉनच्या रक्षाबंधन विशेष दागिन्यांच्या जाहिरातीवरून सुरू झालेला वाद आता थेट राजकीय पातळीवर पोहोचला आहे. काँग्रेस नेते ...
दक्षिण मुंबईच्या मध्यवर्ती भागातील या धोकादायक इमारतींच्या जागी आता आधुनिक सुविधांनी युक्त गगनचुंबी इमारती उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृहनिर्माण विभागाची अंतिम मंजुरी मिळताच या ऐतिहासिक प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल, ज्यामुळे मुंबईतील समूह पुनर्विकासाच्या चळवळीला एक नवी आणि वेगवान दिशा मिळाली आहे.






