मुंबई : यंदा शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन आहे. याच दिवशी खंडग्रास चंद्रग्रहण आहे आणि पौर्णिमा समाप्ती सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांनी आहे. यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी भावाला राखी बांधण्याची शुभ वेळ कोणती यावरून अनेकांचा संभ्रम आहे. राखी सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांपर्यंतच बांधता येणार का ? नंतर राखी बांधता येणार नाही का ? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. या पार्श्वभूमीवर पंचागकर्त्यांनी मार्गदर्शन केले आहे.
मुंबई : यंदा मुंबई शहर आणि मुंबई उपनगर जिल्ह्यात दहीहंडी ऐवजी रक्षाबंधनच्या दिवशी शासकीय सुट्टी मिळणार आहे. या संदर्भात शासकीय परिपत्रक काढण्यात आले ...
यंदा गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी नारळी पौर्णिमा अर्थात श्रावण पौर्णिमा आहे. याच दिवशी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांनी पौर्णिमेचा प्रारंभ होत आहे. रक्षाबंधन शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी आहे आणि याच दिवशी पौर्णिमा समाप्ती सकाळी नऊ वाजून ४७ मिनिटांनी आहे. खंडग्रास चंद्रग्रहण असले तरी ते भारतातून दिसणार नाही. यामुळे ग्रहणाचे वेधादि नियम भारतात पाळण्याची आवश्यकता नाही, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे. जर आपल्या घरात श्रावण पौर्णिमा या तिथीच्या उदयाच्या दिवशी राखी बांधण्याची प्रथा असेल तर गुरुवारी आणि रक्षाबंधनाच्याच दिवशी राखी बांधण्याची प्रथा असेल तर शुक्रवारी राखी बांधता येईल.
- महायुती सरकारची लाडक्या बहिणींना विशेष भेट; १० वर्षांपर्यंत कारावास, ७ लाखांचा दंड, धर्मांतराच्या उद्देशाने केलेले विवाह अवैध मुंबई : गेल्या काही ...
या वर्षी गुरुवार २७ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी नऊ वाजून आठ मिनिटांपासून ते शुक्रवार २८ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्यास्तापर्यंत कधीही राखी बांधता येईल. भावाला राखी बांधण्यासाठी रक्षाबंधनाचा दिवस शुभ आहे. त्यामुळे शुक्रवारी दिवसभरात भावाला राखी बांधता येईल, असे पंचागकर्त्यांचे म्हणणे आहे.