नवी दिल्ली : २००८ च्या मुंबईवरील २६/११ दहशतवादी हल्ल्याला जवळपास १८ वर्षे उलटून गेल्यानंतर भारताने या हल्ल्याच्या कथित सूत्रधारांविरोधात मोठी कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. मुंबई पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाचा (LeT) संस्थापक हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी आणि साजिद मीर यांच्यासह सहा पाकिस्तानी नागरिकांविरोधात ‘इन-अबसेंटिया’ खटला चालवण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे वृत्त आहे. (26/11 Mumbai Attack Hafiz Saeed)
२६/११ प्रकरणातील सहा आरोपी कोण?
या प्रकरणात हाफिज सईद, झकी-उर-रहमान लखवी आणि साजिद मीर यांच्यासोबत अबू अल-कामा, असीम उर्फ अबू काहाफा आणि मेजर अब्दुल रहमान पाशा यांची नावे आरोपी म्हणून समोर आली आहेत. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम न्यायालयात ‘प्रोक्लमेशन रिपोर्ट’ सादर करण्याची शक्यता आहे. या अहवालाद्वारे संबंधित आरोपी फरार असून न्यायालयीन प्रक्रियेपासून दूर आहेत, हे औपचारिकपणे नोंदवण्याची प्रक्रिया केली जाणार आहे. (26/11 Mumbai Attack Hafiz Saeed)
नवी दिल्ली : जंतरमंतरसह देशातील विविध ठिकाणी झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान हिंसाचार आणि पोलिसांच्या कारवाईबाबत करण्यात आलेल्या ...
२६/११ हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू :
२६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातून समुद्रमार्गे मुंबईत आलेल्या १० दहशतवाद्यांनी शहरातील विविध ठिकाणी एकाच वेळी भीषण हल्ले केले होते. सुमारे चार दिवस सुरू असलेल्या या दहशतवादी हल्ल्यात १६६ जणांचा मृत्यू, तर जवळपास ३०० जण जखमी झाले होते. दहशतवाद्यांनी ताजमहाल पॅलेस हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, लिओपोल्ड कॅफे आणि नरिमन हाऊस यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणांना लक्ष्य केले होते. या हल्ल्यातील एकमेव जिवंत पकडला गेलेला दहशतवादी अजमल कसाब होता. त्याच्यावर भारतात खटला चालवण्यात आला आणि २०१२ मध्ये त्याला फाशी देण्यात आली. (26/11 Mumbai Attack Hafiz Saeed)
आरोपी दोषी ठरल्यास काय होणार?
‘इन-अबसेंटिया’ म्हणजे आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष उपस्थित नसतानाही कायदेशीर प्रक्रियेला पुढे नेणे. या प्रक्रियेमुळे पाकिस्तानमध्ये असलेल्या आरोपींविरोधातील खटला भारतीय न्यायव्यवस्थेत पुढे नेण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. जर आरोपी न्यायालयात दोषी ठरले, तर भारतीय न्यायालयाकडून त्यांना शिक्षा सुनावली जाऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष शिक्षेची अंमलबजावणी आरोपी भारतीय कायद्याच्या अधिकारक्षेत्रात आणल्यानंतरच शक्य होईल. (26/11 Mumbai Attack Hafiz Saeed)
भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती नारोशंकर यांना लिहिलेले सुमारे २८० ...
पहलगाम हल्ल्याप्रकरणीही हाफिज सईदवर कारवाई :
दरम्यान, एप्रिल २०२५ मधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणीही हाफिज सईद भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. या हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) दाखल केलेल्या पूरक आरोपपत्रानंतर जुलैमध्ये जम्मूतील न्यायालयाने हाफिज सईदविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. या प्रकरणात NIAने सईदला कथित सूत्रधार म्हणून आरोपी केले आहे. (26/11 Mumbai Attack Hafiz Saeed)