राष्ट्रगीत 'वंदे मातरम'बद्दल ज्येष्ठ अभिनेत्री शर्मिला टागोर (Sharmila Tagore) यांनी केलेल्या वक्तव्यावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत (Kangana Ranaut) हिने नाराजी व्यक्त केली आहे. शर्मिला टागोर यांनी आपले मत मोकळेपणाने मांडल्याबद्दल कंगनाने त्यांचे कौतुक केले, पण कला आणि कवितेकडे बघण्याच्या त्यांच्या विचारांवर आश्चर्यही व्यक्त केले.
कंगनाची सोशल मीडिया पोस्ट : कला आणि कवितेचा अर्थ समजून घ्या
शर्मिला टागोर यांच्या मुलाखतीचा व्हिडिओ शेअर करत कंगनाने लिहिले, "शर्मिला जी यांनी आपले मत मांडले, याबद्दल मला त्यांचा आदर आहे. पण एक कलाकार म्हणून कला आणि साहित्याबद्दल त्यांचे विचार इतके संकुचित कसे असू शकतात? कवितेत किंवा गाण्यात वापरलेले शब्द हे थेट नसून भावना व्यक्त करण्याचे एक माध्यम असतात. कवी किंवा कलाकार आपल्या कल्पनेतून सुंदर शब्द मांडत असतो." कंगनाने पुढे लिहिले, "बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेले 'वंदे मातरम' हे आपल्या स्वातंत्र्याच्या लढ्याची ओळख आहे. देशातील लोकांमध्ये देशप्रेमाची शक्ती जगावी म्हणून त्यांनी हे गीत लिहिले होते. अशा महान कवितेला केवळ धर्माच्या चौकटीत बांधणे योग्य नाही."
Shweta Tiwari on Raj Thackeray : "मराठी माणसाचं हे वर्तन मान्य आहे का?" श्वेता तिवारीचा राज ठाकरेंना थेट परखड सवाल
टीव्ही जगतातील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) हिला सोशल मीडियावर अत्यंत अपमानास्पद कमेंट्स आणि अश्लील शिवीगाळाचा सामना करावा लागला आहे. ...
स्वामी विवेकानंदांचे उदाहरण आणि हिंदू-मुस्लिम मानसिकतेवर भाष्य
आपले म्हणणे पटवून देण्यासाठी कंगनाने स्वामी विवेकानंदांचे उदाहरण दिले. ती म्हणाली, "स्वामी विवेकानंद म्हणाले होते की, मला लोखंडासारखे मजबूत आणि कणखर तरुण हवे आहेत. याचा अर्थ ते हवामानाचा अंदाज सांगत नव्हते, तर तरुणांमधील ताकद जागी करत होते. डॉक्टरांच्या भाषेतही ताकदीला 'शक्ती'च म्हणतात." कंगनाने पुढे आवाहन केले की, "आपण सर्वांनी आता हिंदू-मुस्लिम विचारसरणीतून बाहेर पडले पाहिजे. आपण सर्व एक आहोत. शर्मिला जी, माझे तुमच्यावर मनापासून प्रेम आहे आणि तुम्ही दिलेली प्रेमाची मिठी मला नेहमीच आवडेल."
शर्मिला टागोर काय म्हणाल्या होत्या ?
एका मुलाखतीत शर्मिला टागोर म्हणाल्या होत्या, "भारतात असे अनेक लोक आहेत जे एकाच देवाला मानतात. 'वंदे मातरम'मधील एका भागात वेगवेगळ्या देवी-देवतांची नावे येतात. त्यामुळे एकाच देवाला मानणाऱ्या लोकांना 'वंदे काली' किंवा 'वंदे दुर्गा' म्हणणे थोडे कठीण जाते. त्यामुळे सर्वांना एकत्र घेऊन चालायचे असेल, तर 'वंदे मातरम'ची पहिली दोन कडवी सर्वांसाठी अतिशय योग्य आहेत." दरम्यान, कंगनाच्या या वक्तव्यावर शर्मिला टागोर यांच्याकडून अजून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.