Ravi Shankar Prasad : 'राहुल गांधी अराजकतेचे राजकारण करतात'

नवी दिल्ली : जंतर-मंतर येथील आंदोलनादरम्यान कथित पॅलेट गनच्या छऱ्यांमुळे जखमी झालेल्या साहिल लोचबसोबत (Sahil Lochab) काँग्रेस खासदार राहुल गांधी संसद मार्गावरील डीसीपी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केले. त्यांच्या या आंदोलनावर भाजपने जोरदार टीका केली आहे. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधी यांच्यावर ‘अराजकतेचे राजकारण’ केल्याचा आरोप केला. राहुल गांधी कोणतीही परवानगी न घेता आणि पूर्वसूचना न देता आंदोलनाला बसल्याचे ते म्हणाले.



राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांनी लोकशाही पद्धतीने राजकारण करण्याऐवजी अराजकतेचे राजकारण सुरू केले आहे. संबंधित घटनेबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यामुळे कायदा आणि तपास यंत्रणांना त्यांचे काम करू दिले पाहिजे, असे रविशंकर प्रसाद म्हणाले. या प्रकरणाचा संदर्भ देताना प्रसाद यांनी सांगितले की, संबंधित पीडितानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून न्यायालयाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्षपद सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांकडे असून समितीत अन्य न्यायाधीश तसेच सीबीआयचे माजी संचालक आणि वरिष्ठ अधिकारी यांचा समावेश आहे. ‘गोळीबार झाला की नाही, याचीही चौकशी होणार आहे. अशा परिस्थितीत नियम आणि कायद्याचा आदर न करता केवळ आपल्या इच्छेनुसार आंदोलनाला बसणे योग्य आहे का ?’ असा सवाल रविशंकर प्रसाद यांनी उपस्थित केला.



प्रसाद यांनी काँग्रेसच्या ‘वंदे मातरम्’वरील भूमिकेवरही टीका केली. काँग्रेस या मुद्द्यावर अडचणीत आल्याने जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी राहुल गांधींचे आंदोलन सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसच्या भूमिकेमुळे देशात चुकीचा संदेश गेल्याचा दावा त्यांनी केला. तसेच, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष अराजकतेच्या दिशेने जात आहे. ‘वादविवाद करा, कायदा आपले काम करेल; मात्र सुरू असलेल्या चौकशीच्या प्रकरणावरून पोलिस ठाण्याबाहेर धरणे देणे योग्य नाही,’ असे ते म्हणाले.

Comments
Add Comment

Historical Letter : तब्बल २८० वर्षांपूर्वीच्या मोडी लिपीतील पत्रातून उलगडली बुंदेलखंडातील मराठ्यांची प्रशासन व्यवस्था

भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती

Devendra Fadnavis : पोलीस ठाण्यांची ‘अ’, ‘ब’, ‘क’ वर्गवारी करणार

मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन

Pratap Sarnaik : गणेशोत्सवात स्वस्तात एसटीने गावी जाता येणार

मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. एसटी बसच्या एकेरी गट आरक्षणावर

Shivpal Singh : भालाफेकपटू शिवपाल सिंगवर १० वर्षांची बंदी

नवी दिल्ली : टोकियो २०२० ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणारा ३१ वर्षीय भालाफेकपटू शिवपाल सिंग याच्यावर

Narendra Modi : पंतप्रधान मोदींनी अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि संस्थापकांशी साधला संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी सेवा तीर्थ येथे देशातील २० अंतराळ स्टार्टअपच्या सीईओ आणि

Vishakha Raut : माजी महापौर विशाखा राऊत यांचे नगरसेवक पद धोक्यात जात प्रमाणपत्र ठरवले आहेत

मुंबई (विशेष प्रतिनिधी) : माहीम येथील प्रभाग क्रमांक १९१ मधून निवडून आलेल्या उबाटाच्या नगरसेविका माजी महापौर