Nitesh Rane : मासेमारी बंदी कालावधीत मच्छिमारांना मिळणार आर्थिक मदत

- मत्स्य विभागाचा वित्त विभागाकडे प्रस्ताव; ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना होणार लाभ


मुंबई : पावसाळ्यात दोन ते अडीच महिन्यांच्या मासेमारी बंदीच्या काळात मच्छीमार कुटुंबांसमोर निर्माण होणारा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी विशेष नियोजन केले आहे. आंध्र प्रदेशच्या धर्तीवर राज्यातील गरजू मच्छीमारांना प्रत्येकी २० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्याचा प्रस्ताव मत्स्य विभागाकडून वित्त विभागाकडे पाठवण्यात आला आहे.


राज्यात दरवर्षी १ जून ते ३१ जुलै हा पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी असतो. यंदा हा कालावधी १५ दिवसांनी वाढविण्यात आल्याने १५ ऑगस्टपर्यंत समुद्रात मासेमारी बंद होती. या काळात पारंपरिक मच्छीमारांचे उत्पन्नाचे स्रोत पूर्णपणे बंद होतात. विद्यमान योजनेनुसार पात्र मच्छीमारांना केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून वार्षिक ४ हजार ५०० रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते. मात्र, वाढती महागाई आणि ही अपुरी मदत लक्षात घेता, यात वाढ करून ती २० हजार रुपये करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.


ही मदत सरसकट सर्व मच्छीमारांना देण्याऐवजी खरोखर गरजू असलेल्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यावर राज्य सरकारचा विशेष भर आहे. लाडकी बहीण योजनेच्या अनुभवातून धडा घेत, सरकार आर्थिक नुकसान टाळण्यासाठी संपूर्ण खबरदारी घेत आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सात किनारी जिल्ह्यांतील मच्छीमारांचा या योजनेत समावेश करण्यात आला असून, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस (टीस) या संस्थेकडून गरजू मच्छीमारांचे सर्वेक्षण केले जात आहे. यात रायगड जिल्ह्यात सर्वाधिक लाभार्थ्यांची नोंद झाली असून त्यानंतर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीचा क्रमांक लागतो.


मच्छीमारी करणारे काही व्यावसायिक मच्छीमार पर्ससीन नेटने मासेमारी करतात आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न आहेत. त्यामुळे ज्यांना खरोखर आवश्यकता आहे, अशाच पात्र आणि गरजू मच्छीमारांना ही आर्थिक मदत दिली जाईल, असे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले आहे. राज्यातील ८ हजार ८२९ मच्छीमार कुटुंबांना यामुळे दिलासा मिळणार आहे.

Comments
Add Comment

UBT : धाराशिव जिल्ह्यात 'उबाठा'ला खिंडार

- १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राणा जगजीतसिंह पाटलांनी ओमराजे-कैलास पाटलांना दिला मोठा धक्का मुंबई : धाराशिव

Chandrakant Patil : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना दरमहा २ हजार पॉकेटमनी ? उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे सूतोवाच

आर्थिक अडचणींमुळे शैक्षणिक 'गळती' रोखण्याचा उद्देश मुंबई : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी राज्य

CM Devendra Fadnavis : कोरोनामुळे जोडीदार गमावलेल्या दत्तक मुलीचा मुख्यमंत्र्यांनी लावून दिला पुनर्विवाह

मुंबई : कोरोना काळात संकटात सापडलेल्या आणि तत्कालीन विरोधी पक्षनेते असताना दत्तक घेतलेल्या तरुणीचा पुनर्विवाह

Pune School Van Fire : काळ आला होता पण...! पिंपरीत चालू स्कूल व्हॅनने अचानक घेतला पेट, सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

पुणे :  पिंपरी-चिंचवडमध्ये एका खासगी स्कूल व्हॅनला अचानक आग लागल्याची घटना घडली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप

Chhatrapati Sambhajinagar : "सॉरी आई-आप्पा, पुढच्या जन्मी नक्की डॉक्टर बनेन"; १९ वर्षीय तरुणाने शेवटची चिट्ठी लिहिली अन्...

छत्रपती संभाजीनगर : वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न अपुरे राहिल्याच्या नैराश्यातून छत्रपती

Jalgaon : बुरहानपूर येथे २५.१७ कोटींचा रेल्वे उड्डाणपूल; भुसावळ-खंडवा मार्गिकेच्या भविष्यातील विस्ताराच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण प्रकल्प

Jalgaon : मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागामार्फत (Bhusawal Division of Central Railway) बुरहानपूर येथील लालबाग-खुनी भंडारा परिसरात रेल्वे व