मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्यांचे परमिट रद्द करणार
मुंबई : राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी लागू करण्यात आलेल्या व्यावहारिक मराठी भाषेच्या परीक्षेत तब्बल ७ हजार ७५० चालक नापास झाले आहेत. पुरेशी मुदत देऊनही मराठी शिकण्यास टाळाटाळ करणाऱ्या मुजोर चालकांवर आता कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असून, त्यांना ३० दिवसांची अंतिम नोटीस दिली जाईल. या कालावधीतही सुधारणा न झाल्यास आधी परवाना (लायसन्स) निलंबित करून पुढे परमिट रद्द केले जाईल, असा इशारा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला आहे.
लॉस एंजिलीस : हॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री आणि बालकलाकार म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणारी 'हेडन पॅनेटीयर' (Hayden Panettiere) हिचे वयाच्या अवघ्या ३६ व्या ...
महाराष्ट्रात १९८९ च्या मोटार वाहन नियमांनुसार परमिटधारक रिक्षा व टॅक्सी चालकांना मराठीचे व्यावहारिक ज्ञान असणे बंधनकारक आहे. प्रवाशांशी संवाद साधताना भाषेवरून होणारे वाद टाळण्यासाठी परिवहन विभागाने विशेष मोहीम हाती घेतली होती. यासाठी चालक संघटनांच्या विनंतीवरून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती, तसेच कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सहकार्याने विशेष मार्गदर्शन वर्गही चालवण्यात आले. या मोहिमेअंतर्गत राज्यातील सुमारे १ लाख ६५ हजार ऑटो व टॅक्सी चालकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १ लाख ४० हजार चालक उत्तीर्ण झाले असून त्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत. मात्र, अंतिम मुदत संपल्यानंतरही ७ हजार ७५० चालक मराठीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले आहेत.
याविषयी बोलताना परिवहन मंत्र्यांनी स्पष्ट केले की, ज्या चालकांना खरोखर शिकायचे आहे, त्यांना सरकार काही प्रमाणात वेळ वाढवून देण्याचा सकारात्मक विचार करेल. परंतु, मुद्दाम मराठी शिकण्यास नकार देणाऱ्यांवर कारवाई होईल. पहिल्या टप्प्यात ३० दिवसांची नोटीस दिली जाईल; त्यातही मराठी आत्मसात न केल्यास तीन महिन्यांसाठी परवाना निलंबित होईल आणि तरीही सुधारणा न झाल्यास परमिटच रद्द केले जाईल. दरम्यान, अनेक चालक प्रवाशांशी मराठीत बोलण्यास तयार असतात परंतु प्रवासीच हिंदीत संवाद साधतात, असे कारण पुढे केले जात आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी प्रवाशांनाही रिक्षा आणि टॅक्सी चालकांशी मराठीतूनच संवाद साधण्याचे आवाहन केले आहे.






