Devendra Fadnavis : राज्याची पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, नदीजोड प्रकल्प वेगाने राबवणार; स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्र्यांनी केले आश्वस्त

मुंबई : महाराष्ट्राच्या मागील आणि सध्याच्या पिढीने मोठ्या प्रमाणावर दुष्काळाचा सामना केला आहे; मात्र येणाऱ्या पिढीला दुष्काळ पाहावा लागू नये, यासाठी नदीजोड प्रकल्पांच्या माध्यमातून मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांत पाणी पोहोचवून राज्याला कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले. देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात आयोजित मुख्य ध्वजारोहण सोहळ्यानंतर त्यांनी राज्यातील आणि देशातील जनतेला संबोधित करताना हा निर्धार व्यक्त केला.



विकसित भारताच्या संकल्पनेत महाराष्ट्र हे देशाचे ‘ग्रोथ इंजिन’ असून छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानातील मूल्यांना अनुसरून राज्य सातत्याने प्रगती करत असल्याचे त्यांनी सांगितले. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत महाराष्ट्राचा आर्थिक विकासदर जवळपास ८.८ टक्के राहिला असून, राज्यातील १३ जिल्ह्यांनी आपापली आर्थिक उद्दिष्टे पूर्ण केली आहेत. गडचिरोली, पालघर आणि नंदुरबारसारख्या दुर्गम भागांपर्यंत विकास शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक जिल्हा 'ग्रोथ इंजिन' बनवण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेच्या माध्यमातून ५६ लाख शेतकऱ्यांना ३६ हजार कोटी रुपयांचे आर्थिक कवच दिले जात आहे. याशिवाय, सध्या ७६ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून दिली जात असून, येत्या वर्षभरात राज्यातील १०० टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा संकल्प पूर्ण केला जाईल. महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा देणारा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरल्याचा आनंदही त्यांनी व्यक्त केला.



महाराष्ट्र हे देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’


महाराष्ट्र हे देशाचे ‘स्टार्टअप कॅपिटल’ बनले असून सर्वाधिक परकीय गुंतवणूक आणि औद्योगिक गुंतवणूक राज्यात येत आहे. या माध्यमातून युवाशक्तीसाठी रोजगाराच्या विपुल संधी निर्माण केल्या जात आहेत. तसेच तरुणांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी ‘एज्युसिटी’च्या माध्यमातून परदेशी विद्यापीठांना राज्यात निमंत्रित केले जात आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगातील चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्यापर्यंत केलेली वाटचाल विलक्षण असून, २५ कोटी नागरिकांना गरिबीतून बाहेर काढण्यात भारताला यश आले असल्याचे सांगत त्यांनी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Comments
Add Comment

DJ Lavani Restrictions : 'डीजे'च्या तालावर होणाऱ्या अश्लील लावण्यांवर निर्बंध

- राज्य सरकारचा निर्णय; 'रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळा'चे प्रमाणपत्र बंधनकारक मुंबई : महाराष्ट्राची समृद्ध

Central Railway Headquarters : मध्य रेल्वे मुख्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात संपन्न; १५ डब्यांच्या २२ नव्या लोकल सेवांची घोषणा

मुंबई: मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक श्री. राजीव श्रीवास्तव यांच्या हस्ते १५ ऑगस्ट २०२६ रोजी छत्रपती शिवाजी

IBPS PO Prelims Admit Card 2026 जारी; २२ आणि २३ ऑगस्टला होणार परीक्षा, असे करा कार्ड डाउनलोड

मुंबई : बँकिंग क्षेत्रात नोकरीच्या तयारीत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग

Zeeshan Siddique : झीशान सिद्दीकींना पोर्तुगाल नंबरवरून जीवे मारण्याची धमकी; वांद्रे पोलिसांत NC दाखल

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी (Zeeshan Siddique) यांना पोर्तुगालमधील एका क्रमांकावरून व्हॉइस नोट

Worli Century Land : वरळीतील सेंच्युरीची जागा पेडर रियल्टी कंपनीकडे भाडेतत्वावर; सुधार समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी

- महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार १,३५१ कोटी रुपये - स्थानिकांचे पुनर्वसन त्याच ठिकाणी होणार, अध्यक्षांनी दिली

BMC NEWS : पदपथ अतिक्रमण मुक्त मोहिमेला अडथळा; जेसीबी अभावी विभागातील कारवाई थंडावली

स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांच्या कार्यपध्दतीवर