आमदार निलेश राणे यांचा सालाबाद प्रमाणे उपक्रम
मालवण : गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘शिवसेना एक्सप्रेस’ या विशेष रेल्वेगाडीची व्यवस्था करण्यात आली आहे. कुडाळ-मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार निलेश नारायणराव राणे यांच्या पुढाकारातून सालाबाद प्रमाणे मोफत स्वरूपात ही विशेष रेल्वेसेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Shiv Sena Express)
१२ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता दादर रेल्वे स्थानकातून ‘शिवसेना एक्सप्रेस’ कुडाळच्या दिशेने रवाना होणार आहे. या विशेष रेल्वेगाडीमुळे मुंबईत वास्तव्यास असलेल्या कोकणातील नागरिकांना गणेशोत्सवाच्या काळात आपल्या मूळ गावी जाण्यास मोठी मदत होणार आहे. विशेष म्हणजे या प्रवासासाठी प्रवाशांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नसून प्रवास पूर्णपणे मोफत ठेवण्यात आला आहे. (Nilesh Rane)
चाकरमान्यांसाठी दिलासा देणारा उपक्रम
गणेशोत्सवाच्या काळात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या रेल्वे व बसगाड्यांना मोठी गर्दी असते. तिकीट मिळविण्यासाठी नागरिकांना मोठी धावपळ करावी लागते, तसेच प्रवासाचा खर्चही अनेक कुटुंबांसाठी मोठा असतो. ही अडचण लक्षात घेऊन आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून दरवर्षी ‘शिवसेना एक्सप्रेस’ची व्यवस्था केली जाते. त्यामुळे अनेक चाकरमान्यांना कोणताही आर्थिक भार न घेता गणेशोत्सवासाठी आपल्या गावाकडे जाता येते.
‘कोकणात जाऊन आपल्या कुटुंबीयांना भेटता यावं आणि गणपती सण साजरा करता यावा, म्हणून आमचा दरवर्षी हा प्रयत्न असतो,’ अशी भावना आमदार निलेश राणे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या उपक्रमातून मुंबईतील कोकणवासीयांशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित होत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे.
मुंबई : कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (KUADA) कार्यक्षेत्रातील विनापरवाना व अनधिकृत बांधकामांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी. या ...
मोफत प्रवासासोबत पारदर्शक बुकिंग व्यवस्था
‘शिवसेना एक्सप्रेस’साठी सीट बुकिंगची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत, सोमवार ते शनिवार सीट बुकिंग करता येणार आहे. बुकिंगसाठी ८४२५९०१२०२ आणि ८४२५९०१५४५ या क्रमांकांवर संपर्क साधता येईल. (Shiv Sena Express)
प्रवासासाठी सरकारी ओळखपत्र अनिवार्य असून बुकिंग अहस्तांतरणीय राहणार आहे. तसेच कोणत्याही व्यक्तीला बुकिंग किंवा प्रवासासाठी कोणताही मोबदला देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे प्रवाशांनी अधिकृत बुकिंग प्रक्रियेचा अवलंब करूनच आपली सीट निश्चित करावी, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
‘सेवा हीच बांधिलकी’ या भावनेतून उपक्रम
आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राबविण्यात येणारा हा उपक्रम केवळ रेल्वे प्रवासाची सुविधा उपलब्ध करून देणारा नसून, मुंबई आणि कोकण यांच्यातील भावनिक नाते अधिक दृढ करणारा उपक्रम म्हणून पाहिला जात आहे. रोजगार, व्यवसाय आणि शिक्षणाच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेल्या अनेक कोकणवासीयांसाठी गणेशोत्सव हा आपल्या मातीत, आपल्या घरात आणि आपल्या माणसांसोबत साजरा करण्याचा विशेष सण आहे. त्यामुळे आर्थिक परिस्थिती, रेल्वे तिकिटांची उपलब्धता किंवा गर्दी यामुळे कोणालाही गणेशोत्सवापासून दूर राहावे लागू नये, या उद्देशाने विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रत्यक्ष कृती करण्याच्या भूमिकेचा हा उपक्रम नमुना असल्याचे मानले जात आहे. (Nilesh Rane)
दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नांमध्ये ‘शिवसेना एक्सप्रेस’ला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. यंदाही मोठ्या संख्येने कोकणवासीय या सेवेचा लाभ निश्चितच घेतील.






