Simhastha Kumbh Mela : कुंभमेळ्याच्या नावाखाली ५०० ते ६०० कोटींचं फेक वर्क ऑर्डर रॅकेट ? गिरीश महाजनांचा मोठा गौप्यस्फोट

Nashik : नाशिक - त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ( Simhastha Kumbh Mela ) कामांच्या नावाखाली मोठ्या आर्थिक फसवणुकीचे रॅकेट सुरू असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या नावाचा आणि ‘एस’ अक्षराच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून हुबेहूब बनावट कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) तयार करण्यात आले. या बनावट आदेशांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये उकळण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. या फसवणुकीचा आकडा तब्बल ५०० ते ६०० कोटी रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता असल्याचा मोठा गौप्यस्फोट मंत्री गिरीश महाजन (Minister Girish Mahajan) यांनी सोमवारी जळगाव येथे पत्रकार परिषदेत केला.



५०० ते ६०० कोटींचे फेक वर्क ऑर्डर


कुंभमेळ्याच्या बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात येणाऱ्या पोलिसांना जेवण, पिण्याचे पाणी, चटया, बादल्या, चादरी आणि इतर साहित्य पुरविण्याच्या नावाखाली हे बनावट कार्यारंभ आदेश देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, एका कार्यारंभ आदेशाची रक्कम तब्बल १०० ते १५० कोटी रुपयांच्या आसपास असल्याचे गिरीश महाजन यांनी सांगितले. कुंभमेळ्याच्या कामांसाठी शासनाकडून अधिकृत ऑनलाइन निविदा प्रक्रिया राबवली जाते. मात्र, या प्रकरणात ज्यांना वर्क ऑर्डर देण्यात आले, त्यांनी संबंधित कामांसाठी कोणतीही ऑनलाइन निविदा भरलेली नव्हती. तरीही संशयितांकडून संबंधित व्यक्तींकडून रोख रक्कम आणि धनादेशाच्या माध्यमातून पैसे उकळण्यात आले आणि त्यांना ऑफलाइन कार्यारंभ आदेश देण्यात आले.



बनावट आदेश हुबेहूब अधिकृत कागदपत्रांसारखे


विशेष म्हणजे, हे बनावट आदेश शासनाच्या अधिकृत कागदपत्रांसारखेच हुबेहूब तयार करण्यात आले होते. त्यामुळे अनेक जण या फसवणुकीला बळी पडल्याचे समोर आले आहे. अधिकृत कार्यारंभ आदेशावर सामान्यतः क्यूआर कोड असतो. तसेच महसूल आयुक्त प्रवीण गेडाम यांचे नाव अशा पद्धतीने नमूद केले जात नाही. मात्र, बनावट आदेशांमध्ये त्यांचे नाव आणि केवळ ‘एस’ अक्षराची डिजिटल स्वाक्षरी वापरण्यात आल्याचे आढळले आहे. चार ते पाच जणांनी आपल्याकडे येऊन हे बनावट कार्यारंभ आदेश दाखवल्यानंतर हा प्रकार उघडकीस आल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.



या प्रकरणाची गंभीर दखल


सध्या त्यांच्याकडे चार बनावट आदेश असल्याची माहितीही त्यांनी दिली. हे आदेश मार्च आणि एप्रिल महिन्यातील असल्याचे सांगण्यात आले आहे. या प्रकरणात जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील दोन आणि धुळे जिल्ह्यातील एका व्यक्तीचा संशयितांमध्ये समावेश असल्याचा दावा महाजन यांनी केला आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही जण सहभागी असण्याची शक्यताही व्यक्त करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करून संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत दोषींवर गुन्हे दाखल करून त्यांना ताब्यात घेण्याच्या सूचना दिल्याचे महाजन यांनी सांगितले.



...तर नागरिकांनी पोलिसांत तक्रार दाखल करावी


दरम्यान, बनावट आदेश तयार करताना शासनाच्या अधिकृत कागदपत्रांची हुबेहूब नक्कल करण्यात आल्याने या प्रकरणात विभागातील अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचाही तपास केला जाणार आहे. तसेच, अशा प्रकारे फसवणूक झालेल्या नागरिकांनी पुढे येऊन पोलिसांत तक्रार दाखल करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. तक्रारींच्या आधारे या संपूर्ण रॅकेटचा तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : दाभोळ खाडीतील मत्स्यव्यवसायाच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना करा

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील दाभोळ खाडी परिसरातील मच्छीमारांच्या विविध समस्या तसेच औद्योगिक वसाहतीतून

अमेरिकन प्रचारात ॲनिमे व गेम्सचा वापर, जपानने अमेरिकेला सुनावले

टोकियो : जागतिक मुत्सद्देगिरीत एक अत्यंत अनोखा वाद समोर आला आहे. जगभरात लोकप्रिय असलेल्या जपानी संस्कृतीची ओळख

Nitesh Rane : मंत्री नितेश राणेंनी घेतली 'ताज हॉटेल्स'च्या सीईओंची भेट

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी

Nitesh Rane : फळपीक विम्यातील तांत्रिक त्रुटी तातडीने दूर करा

- मंत्री नितेश राणे यांचे निर्देश; पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी कार्यवाही करा मुंबई :

Food Poisoning : आश्रमशाळेच्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा; २७ मुले, ५ मुली उपजिल्हा रुग्णालयात

नांदेड : देगलूर तालुक्यातील हणेगावच्या वसंतराव नाईक निवासी आश्रमशाळेत जेवणातून

CM Devendra Fadnavis : भारताला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; परकीय शक्तींना 'भारत छोडो' म्हणण्याची वेळ मुंबई : "काही परकीय शक्ती भारताच्या