मुंबई : राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. FYJC Admission 2026 ची पाचवी विशेष फेरी म्हणजेच एकूण आठवी प्रवेश फेरी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांना मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयांची अलॉटमेंट लिस्ट शनिवार, ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता जाहीर करण्यात आली आहे. (FYJC Admission 2026)
राज्यभरात अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन केंद्रीभूत पद्धतीने राबवली जात आहे. आतापर्यंत अकरावी प्रवेशाच्या तीन नियमित आणि चार विशेष अशा एकूण सात फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर काही काळ प्रवेशाचे पोर्टल बंद ठेवण्यात आले होते. आता पुन्हा विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली आहे. (FYJC Admission 2026)
८ ते १० ऑगस्टदरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी :
पाचव्या विशेष फेरीसाठी विद्यार्थ्यांना ४ ते ६ ऑगस्टदरम्यान अर्ज नोंदणी, भाग-१ मधील आवश्यक दुरुस्ती, भाग-२ भरणे आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे पर्याय निवडण्याची संधी देण्यात आली होती. ७ ऑगस्ट रोजी दाखल झालेल्या अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर ८ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता या फेरीतील पात्र विद्यार्थ्यांची तसेच त्यांना मिळालेल्या महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात आली. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयाचे वाटप होईल, त्यांना ८ ते १० ऑगस्टदरम्यान संबंधित महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. त्यानंतर ११ ऑगस्ट रोजी प्रवेशानंतर शिल्लक राहिलेल्या रिक्त जागांची यादी जाहीर केली जाणार आहे. (FYJC Admission 2026)
वॉशिंग्टन : भारत आणि अमेरिकेतील व्यापार संबंधांवर परिणाम करणारी मोठी घडामोड समोर आली आहे. रशियाकडून तेल आणि इतर ऊर्जा उत्पादने खरेदी करणाऱ्या देशांवर ...
नाशिक विभागात २ लाख २६ हजारांहून अधिक जागा :
यंदा नाशिक विभागात अकरावी प्रवेशासाठी एकूण २ लाख २६ हजार २०५ जागा उपलब्ध आहेत. आतापर्यंत झालेल्या सात प्रवेश फेऱ्यांमध्ये १ लाख ४६ हजार ११७ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. त्यामुळे अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी पाचवी विशेष फेरी महत्त्वाची ठरणार आहे. (FYJC Admission 2026)
‘या’ विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रिया रद्द करावी :
दरम्यान, शिक्षण संचालनालयाने विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन केले आहे. अनेक विद्यार्थी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर अकरावी प्रवेशासोबतच पॉलिटेक्निक, औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) किंवा अन्य अभ्यासक्रमांसाठीही अर्ज करतात. काही विद्यार्थ्यांना या पर्यायी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळाल्यानंतरही ते अकरावीच्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेतून आपला अर्ज रद्द करत नाहीत. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचे अर्ज प्रवेश प्रक्रियेत कायम राहतात आणि उपलब्ध जागांचा अचूक अंदाज घेण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अकरावीऐवजी अन्य अभ्यासक्रमात प्रवेश निश्चित केला आहे, त्यांनी FYJC प्रवेश प्रक्रियेतून आपला अर्ज रद्द करावा, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे. (FYJC Admission 2026)
मुंबई : गणरायाच्या आगमनाची चाहूल लागली असून, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू झाली आहे. गणेशोत्सवात मुंबई, ठाणे, पालघर आणि ...
विद्यार्थ्यांनी तारखा लक्षात ठेवाव्यात :
८ ऑगस्ट, सकाळी १० वाजता : पाचव्या विशेष फेरीची अलॉटमेंट लिस्ट जाहीर ८ ते १० ऑगस्ट : मिळालेल्या महाविद्यालयात प्रवेश निश्चित करण्याची मुदत ११ ऑगस्ट : प्रवेशानंतरच्या रिक्त जागांची यादी जाहीर (FYJC Admission 2026)
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी :
अकरावी प्रवेशाच्या आतापर्यंतच्या सात फेऱ्यांनंतरही ज्या विद्यार्थ्यांना अपेक्षित महाविद्यालयात प्रवेश मिळालेला नाही किंवा ज्यांनी अद्याप प्रवेश निश्चित केलेला नाही, त्यांच्यासाठी ही पाचवी विशेष फेरी म्हणजे प्रवेशाची आणखी एक महत्त्वाची संधी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अलॉटमेंट लिस्ट जाहीर झाल्यानंतर आपले महाविद्यालय तपासून दिलेल्या मुदतीत प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे. (FYJC Admission 2026)





