Pratap Sarnaik : ‘रॅपिडो’शी व्यावसायिक संबंधांचे पुरावे द्या!

- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे संजय राऊतांना प्रत्युत्तर; प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देणे योग्य नाही


मुंबई : ‘रॅपिडो’शी काही मंत्र्यांच्या आर्थिक आणि व्यावसायिक संबंध असल्याचा तसेच कार्यक्रमांना प्रायोजकत्व मिळाल्याचा आरोप करणाऱ्या संजय राऊतांनी यासंदर्भात ठोस कागदपत्रे आणि पुरावे सादर करावेत, असे आव्हान मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी बुधवारी दिले. प्रत्येक गोष्टीला राजकीय रंग देण्यापेक्षा वस्तुस्थिती समजून घेण्याचे आवाहन त्यांनी राऊतांना पत्र लिहून केले आहे. (Sanjay Raut)


संजय राऊत यांनी अलीकडेच परिवहन विभागाला पत्र लिहून बाईक टॅक्सीच्या निर्णयामुळे हजारो रिक्षाचालकांच्या रोजगारावर संकट येईल, असा दावा केला होता. तसेच या प्रकरणात मंत्र्यांवर संशय व्यक्त केला होता. या पत्राला सविस्तर उत्तर देताना मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर राजकारण करणे योग्य नाही. बाईक टॅक्सीमुळे एकीकडे तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी मिळणार आहेत, तर दुसरीकडे पारंपरिक रिक्षाचालकाचा रोजगार आणि सामाजिक सुरक्षा सुरक्षित ठेवणे हीदेखील सरकारचीच जबाबदारी आहे. ही दोन्ही चाके समतोलपणे चालवावी लागतील, असे त्यांनी नमूद केले. (Pratap Sarnaik)



रॅपिडो असो किंवा कोणतीही अन्य कंपनी, सरकारपेक्षा मोठे कोणीही असू शकत नाही आणि नियमांपेक्षा वरचे स्थान कोणालाही दिले जाणार नाही, असे स्पष्ट करत सरनाईक (Pratap Sarnaik) म्हणाले की, परिवहन विभागाचे निर्णय कोणत्याही ओळखीवर नव्हे तर कायदेशीर नियमांवर चालतात. तसेच संजय राऊत यांनी नाशिक ते मंत्रालय काढलेल्या मोर्च्याच्या भूमिकेवर बोलताना, आंदोलनाला परवानगी नाकारली असेल तर त्यामागची प्रशासकीय कारणे तपासणे गरजेचे असल्याचे त्यांनी सुचवले. रिक्षाचालकांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी हवे तर 'सामना'च्या कार्यालयातही यायला तयार असल्याचे सांगत, राजकारण कमी आणि वस्तुस्थितीवर अधिक चर्चा करूया, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.

Comments
Add Comment

FDA Inspections : गणेशोत्सवात महाप्रसादासाठी लागणार परवाना

- भंडाऱ्यावरही असणार ‘एफडीए’ची नजर मुंबई : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांततर्फे

Nepal floods : नेपाळमधील पूरपरिस्थितीत नांदेडचे पर्यटक अडकले; मदतीसाठी जिल्हा प्रशासनाने जारी केले तात्काळ संपर्क क्रमांक

नांदेड : नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या भीषण पूरस्थितीमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले

CM Devendra Fadnavis : गडचिरोलीच्या विकासाला नवी दिशा; ‘ग्रीन स्टील हब’ म्हणून उदयास येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : गडचिरोली जिल्हा निर्मितीला २६ ऑगस्ट रोजी ४४ वर्षे पूर्ण होत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी

CM Devendra Fadnavis : चाकण ‘एमआयडीसी’मध्ये ४९ उद्योगांसोबत सामंजस्य करार

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती; २ हजार ३२० कोटींची गुंतवणूक प्रस्तावित मुंबई : चाकण-भोसरीच्या

Sunetra Pawar : चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचे निर्देश

पुणे : चाकण परिसरातील अनेक समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व

Maharashatra Weather : घाटात जाणाऱ्यांनी सावधान! ४ जिल्ह्यांत जोरदार सरींचा इशारा; जाणून घ्या २६ ऑगस्टचे हवामान अपडेट

मुंबई : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. काही भागांत हलका ते मध्यम पाऊस होत असला, तरी