Russia-Ukraine War : भारतीय पीडितांच्या कुटुंबीयांना माहिती, मदत आणि न्याय मिळवून देण्याचे निर्देश

नवी दिल्ली : रशिया-युक्रेन युद्धादरम्यान नोकरीचे आमिष दाखवून रशियात पाठविण्यात आलेल्या आणि नंतर युद्धभूमीवर पाठवलेल्या भारतीय नागरिकांच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. शुक्रवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला तातडीने एक नोडल अधिकारी नियुक्त करण्याचे निर्देश दिले. हा अधिकारी युद्धात मृत्यूमुखी पडलेले, जखमी झालेले किंवा अद्याप बेपत्ता असलेल्या भारतीयांच्या कुटुंबीयांशी सातत्याने संपर्क ठेवेल तसेच त्यांना आवश्यक माहिती व मदत उपलब्ध करून देईल. (Russia-Ukraine War)



सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठाने नमूद केले की, पीडित कुटुंबे आधीच गंभीर मानसिक आणि आर्थिक संकटातून जात आहेत. अशा परिस्थितीत त्यांना वेळेवर अचूक माहिती आणि शक्य ती सर्व मदत पुरविण्याची जबाबदारी सरकारची आहे.न्यायालयाच्या निर्देशांनुसार, परराष्ट्र व्यवहार मंत्रालयात एक समर्पित नोडल अधिकारी नियुक्त केला जाईल, जो पीडित कुटुंबीयांशी थेट संपर्कात राहील. युद्धात मृत्यू झालेल्या भारतीयांची ओळख पटविण्यासाठी डीएनए नमुन्यांची पडताळणी आणि जुळणी केली जाईल.नवी दिल्लीतील रशियन दूतावासाकडे नुकसानभरपाईसाठी दावा (क्लेम) दाखल करण्यास परराष्ट्र व्यवहार मंत्रालय कुटुंबीयांना मदत करेल.पीडित कुटुंबीयांना सर्व आवश्यक माहिती आणि प्रक्रिया त्यांच्या मातृभाषेत किंवा स्थानिक भाषेत उपलब्ध करून दिली जाईल. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणे कुटुंबीयांना मोफत कायदेशीर मदत देतील. (Supreme Court of India)



हे प्रकरण त्या भारतीय तरुणांशी संबंधित आहे, ज्यांना ट्रॅव्हल एजंटांनी रशियामध्ये चांगल्या नोकरीचे आमिष दाखवून पाठवले होते. कुटुंबीयांच्या आरोपानुसार, तेथे पोहोचल्यानंतर अनेक तरुणांना त्यांच्या इच्छेविरुद्ध रशिया-युक्रेन युद्धाच्या आघाडीवर पाठविण्यात आले. या काळात अनेक भारतीयांचा मृत्यू झाला, काही जखमी झाले, तर अनेक जण अजूनही बेपत्ता असल्याचे सांगितले जाते.याच पार्श्वभूमीवर संबंधित कुटुंबीयांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून सरकारकडे आपल्या नातेवाईकांचा शोध घेण्याची, मृत व्यक्तींचे पार्थिव भारतात आणण्याची आणि रशियन सरकारकडून योग्य नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रभावी पावले उचलण्याची मागणी केली होती.(Russia-Ukraine War)



सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (NALSA) आणि राज्य विधी सेवा प्राधिकरणांना निर्देश दिले आहेत की त्यांनी पीडित कुटुंबीयांना प्रत्येक कायदेशीर प्रक्रियेत मदत करावी. यामध्ये नुकसानभरपाईचा दावा दाखल करणे, आवश्यक कागदपत्रांची तयारी, प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करणे आणि पार्थिव देह भारतात आणण्यासंबंधीच्या औपचारिकता पूर्ण करण्यात सहाय्य करणे यांचा समावेश आहे. न्यायालयाने स्पष्ट केले की, कुटुंबीयांना अनावश्यक कायदेशीर किंवा प्रशासकीय अडचणींना सामोरे जावे लागू नये.

Comments
Add Comment

Narendra Modi : पंतप्रधान मोदी शनिवारी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 ऑगस्ट रोजी आंध्र प्रदेश आणि कर्नाटकच्या एकदिवसीय दौऱ्यावर राहणार आहेत. या

Nipun : स्वदेशी बनावटीची दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका ‘निपुण’ नौदलाकडे सुपूर्द

विशाखापट्टणम : हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडने बांधलेली 'निपुण' ही दुसरी पाणबुडी सहाय्य युद्धनौका 30 जुलै रोजी

Army Chief General Dhiraj Seth : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी स्वदेशी 'एक्सट्रीम वेदर ग्रेड' डिझेलचा केला प्रारंभ

नवी दिल्ली : लष्करप्रमुख जनरल धीरज सेठ यांनी नवी दिल्ली येथे स्वदेशात विकसित 'एक्सट्रीम वेदर ग्रेड'

Umar Abdullah : उमर अब्दुल्ला-पायल यांचा वैवाहिक वाद अखेर संपला; सर्वोच्च न्यायालयाकडून परस्पर संमतीने घटस्फोट मंजूर

जम्मू- काश्मीर : जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला आणि त्यांची विभक्त राहणारी पत्नी पायल अब्दुल्ला

Uttarkhand Suicide : लग्नानंतर अवघ्या ८ महिन्यांत शिक्षिकेची आत्महत्या; मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत सासरच्या छळाचा गंभीर आरोप

उत्तराखंड : सरकारी शाळेतील शिक्षिका सृष्टी कंधारी हिने लग्नानंतर अवघ्या आठ महिन्यांत (Uttarkhand Suicide) आत्महत्या

Live Heart : भारतात पहिल्यांदाच ऐतिहासिक कामगिरी! वंदे भारत ट्रेनद्वारे सुरतहून अहमदाबादला यशस्वीरीत्या केली जिवंत हृदयाची वाहतूक

अहमदाबाद: भारताच्या वैद्यकीय आणि रेल्वे इतिहासात एका सुवर्णपानाची भर पडली आहे. देशात प्रथमच रेल्वेच्या