रियासी : जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यातील जगातील सर्वात उंच रेल्वे पूल असलेल्या चिनाब रेल्वे पुलावरून कटरा-श्रीनगर वंदे भारत एक्सप्रेसने पहिल्यांदाच ताशी जवळपास 100 किमी वेगाने प्रवास केला. यामुळे या मार्गावरील रेल्वे प्रवास अधिक वेगवान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
श्री माता वैष्णो देवी कटरा ते बनिहालदरम्यानचा 111 किमी लांबीचा नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्ग उत्तर रेल्वेच्या जम्मू विभागांतर्गत येतो. या मार्गावर धावणाऱ्या गाड्यांचा कमाल वेग ताशी 100 किमीपर्यंत वाढवण्यास रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. यापूर्वी या मार्गावरील गाड्यांना कटरा-संगालदान दरम्यान ताशी 85 किमी, तर संगालदान-बनिहाल मार्गावर ताशी 75 किमी वेगाची मर्यादा होती.
छिंदावाडा : मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील एका सरकारी शाळेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये काही विद्यार्थी ...
रेल्वेच्या सुरक्षेशी संबंधित आवश्यक तपासण्या आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर वेग वाढवण्यास परवानगी देण्यात आली. त्यानंतर वंदे भारत एक्सप्रेसने या मार्गावर जवळपास 100 किमी प्रतितास वेग गाठला.
या वेगवाढीमुळे कटरा आणि काश्मीर खोऱ्यातील प्रवासाचा वेळ कमी होण्याची अपेक्षा आहे. जम्मू आणि काश्मीरमधील रेल्वे संपर्क अधिक मजबूत होण्यासही यामुळे मदत होणार आहे.
जम्मूचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक उचित सिंघल यांनी सांगितले की, रेल्वेचा वाढलेला वेग प्रवाशांसाठी अधिक जलद आणि आरामदायी प्रवासाची सुविधा देईल. तसेच या रेल्वे मार्गामुळे जम्मू-काश्मीरमधील पर्यटन, व्यापार आणि आर्थिक हालचालींना चालना मिळण्याची शक्यता आहे.
चिनाब रेल्वे पूल हा उंचीच्या दृष्टीने जगातील सर्वात उंच रेल्वे पूल आहे. त्यामुळे या पुलावरून वंदे भारत एक्सप्रेसने जवळपास 100 किमी प्रतितास वेगाने धावणे ही भारतीय रेल्वेसाठी महत्त्वाची बाब मानली जात आहे. प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊनच या मार्गावरील वेग वाढवण्यात आल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.