धाराशिव : गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांवर काळाने घाला घातला. धाराशिव रोडवरील आळणी पाटीजवळ भरधाव कंटेनरने पिकअप व्हॅनला जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला असून २२ ते २३ जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोन जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे. (Road Accident)
मिळालेल्या माहितीनुसार, उमरगा तालुक्यातील नारगवाळी, बोरी आणि मातोळा येथील भाविक गुरुपौर्णिमेनिमित्त शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून ते पिकअप वाहनातून आपल्या गावी परतत असताना धाराशिव रोडवरील टोलनाक्यापुढे आळणी पाटीजवळ हा भीषण अपघात घडला.
Indian Citizenship : भारतीय नागरिकत्वाचा पुरावा काय? आधार, पॅन, मतदार ओळखपत्र चालणार नाही; कोर्टाने स्पष्ट केली भूमिका
भारतीय नागरिकत्व (Citizenship) सिद्ध करण्यासाठी केवळ आधार (Aadhaar), पॅन (PAN), मतदार ओळखपत्र (Voter ID), बँक पासबुक (Bank Passbook) किंवा वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रे (Property Documents) ...
Indian Citizenship : भारतीय नागरिकत्वाचा पुरावा काय? आधार, पॅन, मतदार ओळखपत्र चालणार नाही; कोर्टाने स्पष्ट केली भूमिका
भारतीय नागरिकत्व (Citizenship) सिद्ध करण्यासाठी केवळ आधार (Aadhaar), पॅन (PAN), मतदार ओळखपत्र (Voter ID), बँक पासबुक (Bank Passbook) किंवा वडिलोपार्जित मालमत्तेची कागदपत्रे (Property Documents) ...
">प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगात येणाऱ्या कंटेनरने पिकअप व्हॅनला मागून जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की पिकअपचे केबिन आणि मागील ट्रॉली वेगळी होऊन रस्त्यावर विखुरली. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला आणि जखमींच्या आक्रोशाने परिसर हादरून गेला. (Road Accident)
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलीस आणि आपत्कालीन मदत पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना तात्काळ बाहेर काढून धाराशिव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. रुग्णालयात डॉक्टरांकडून सर्व जखमींवर उपचार सुरू असून गंभीर जखमींवर विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. (Road Accident)
Ganeshotsav 2026 : बाप्पाच्या आगमनाची चाहूल! मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांकडून गणेशोत्सव २०२६ च्या तयारीला विधिवत सुरुवात
मुंबई : अवघ्या काही आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सव २०२६च्या पार्श्वभूमीवर मुंबईतील प्रसिद्ध सार्वजनिक गणेश मंडळांनी पारंपरिक धार्मिक विधींनी ...
या अपघातात वाहनातील महिला भाविकांनाही दुखापत झाली असून मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. तसेच अपघाताचे नेमके कारण काय, कंटेनर चालकाचा वेग, निष्काळजीपणा किंवा इतर कोणते कारण याचा तपास पोलीस करत आहेत. गुरुपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी साईबाबांचे दर्शन घेऊन आनंदाने परतणाऱ्या भाविकांवर अचानक ओढवलेल्या या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. (Road Accident)