इस्लामाबाद : पाकव्याप्त काश्मीरमध्ये पाकिस्तानी प्रशासनाविरोधात नागरिकांचा तीव्र उद्रेक झाला असून तेथील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली आहे. रावलकोट येथे आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या नागरिकांवर पाकिस्तानी सुरक्षा दलांनी अचानक अंदाधुंद गोळीबार केला. 'जॉइंट अवामी अॅक्शन कमिटी'ने दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात १९ आंदोलकांचा मृत्यू झाला असून १२ पेक्षा अधिक नागरिक गंभीर जखमी झाले आहेत. या मानवाधिकार उल्लंघनाच्या घटनेवर भारताने कडक शब्दांत प्रतिक्रिया देत पाकिस्तानचा तीव्र निषेध केला आहे.(Islamabad)
नवी दिल्ली : स्ट्रेट ऑफ होर्मुझ भागातील वाढत्या लष्करी आणि राजकीय तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने द्रवीभूत पेट्रोलियम गॅसच्या (LPG) आयातीबाबत एक ...
जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीने दिलेल्या माहितीनुसार, आंदोलकांचा ताफा चिनार चौकातून पुढे जात मकबूल भट शहीद चौक येथे मुक्कामासाठी थांबण्यापूर्वी डी-चौकाच्या दिशेने निघाला होता. ताफा पुढे जात असतानाच पाकिस्तानी सुरक्षा दलांनी आंदोलकांना क्रूरपणे रोखण्यासाठी थेट गोळीबार सुरू केला. या गोळीबारात जॉइंट अवामी अॅक्शन कमिटीचे संस्थापक उमर नझीर कश्मीरी यांचे धाकटे बंधू उस्मान नझीर यांच्यासह विविध भागांतील आंदोलकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन बलोच नागरिकांचाही समावेश असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.(Pakistan)
Nashik : नाशिककरांनो, उद्याच्या पाणीपुरवठ्याबाबत महत्त्वाची बातमी आहे. सातपूर परिसरातील मुख्य गुरुत्ववाहीनीला मोठी गळती लागल्याने मनपाला तातडीने ...
पाकव्याप्त काश्मीरमधील या हिंसक कारवाईवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने तीव्र शब्दांत भाष्य केले आहे. "पाकव्याप्त काश्मीरमध्ये सुरू असलेला नागरिकांचा आक्रोश हा इस्लामाबादने गेल्या अनेक दशकांपासून केलेल्या प्रशासकीय दडपशाही आणि शोषणाचा थेट परिणाम आहे. निःशस्त्र आंदोलकांवर केलेली लष्करी व पोलिसी कारवाई अत्यंत निषेधार्ह असून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला आहे," असे भारताने म्हटले आहे.
मुंबई : पालघर हा मुबलक पाऊस पडणारा आणि वेगाने नागरीकरण होत असलेला जिल्हा असल्याने या अनुषंगाने भविष्यातील विविध प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी ...
खैबर पख्तूनख्वामध्ये आत्मघाती हल्ला
दुसऱ्या एका घटनेत, पाकिस्तानच्या उत्तर-पश्चिम भागातील खैबर पख्तूनख्वा प्रांतात २४ जुलै रोजी एक मोठा आत्मघाती दहशतवादी हल्ला झाला. अफगाणिस्तान सीमेलगत असलेल्या टँक जिल्ह्यात, लष्करी आणि पोलीस सुरक्षा चौकीवर दहशतवाद्यांनी स्फोटकांनी भरलेले वाहन थेट चौकीच्या बाहेरील भिंतीवर आदळवले. या भीषण स्फोटात १२ पाकिस्तानी सुरक्षा जवानांसह एकूण १५ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.