Ram Mandir Case, : राम मंदिर प्रकरण : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवी एसआयटी स्थापन

नवी दिल्ली : अयोध्या येथील राम मंदिरातील देणगीच्या कथित गैरव्यवहार प्रकरणी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या प्रकरणात निष्पक्ष चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने नव्याने विशेष तपास पथक (sit) स्थापन केल्याची माहिती न्यायालयात दिली. सरन्यायमूर्ती सूर्यकांत, न्या. जॉयमाल्य बागची आणि न्या. व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर राज्य सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी बाजू मांडली. त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करून नव्या एसआयटीची पुनर्रचना करण्यात आली आहे.मेहता यांनी न्यायालयाला सांगितले की, लखनौ परिक्षेत्राच्या पोलीस महानिरीक्षक (IG) किरण एस यांची तपास पथकाच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे.



तसेच तीन सदस्यीय एसआयटीमध्ये अयोध्या परिक्षेत्राचे उपपोलीस महानिरीक्षक (dig) सोमेन बर्मा आणि अयोध्याचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (ssp) गौरव ग्रोवर यांचाही समावेश करण्यात आला आहे.सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एसआयटीमध्ये चार्टर्ड अकाउंटंटचा (सीए) समावेश करण्याचा सल्ला दिला. यावर तुषार मेहता यांनी लवकरच सीएची नियुक्ती केली जाईल, असे न्यायालयाला आश्वासन दिले.



याशिवाय, न्यायालयाने एसआयटीमध्ये पाचव्या सदस्याच्या रूपाने फॉरेन्सिक ऑडिटरची नियुक्ती करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले. हे विशेष तपास पथक दोन आठवड्यांच्या आत आपला पहिला स्थिती अहवाल (स्टेटस रिपोर्ट) न्यायालयात सादर करणार आहे.सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या सूचनांनंतर 25 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेद्वारे नव्या एसआयटीची स्थापना करण्यात आली.



सुनावणीदरम्यान खंडपीठाने प्रकरणाची पुढील सुनावणी दोन आठवड्यांसाठी तहकूब केली. तसेच, चौकशी प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता राखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील, असे न्यायालयाने स्पष्ट केले.या प्रकरणाची निष्पक्ष, जलद आणि कोणताही भेदभाव न करता चौकशी होणे हेच न्यायालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सरन्यायमूर्तींनी नमूद केले. यापूर्वी 20 जुलै रोजी, सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला राम मंदिरातील देणगीच्या कथित अपहाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले होते.

Comments
Add Comment

Supreme Court : शांततापूर्ण निदर्शने हा संविधानाने दिलेला अधिकार; सर्वोच्च न्यायालयाची महत्त्वाची टिप्पणी

नवी दिल्ली : नीट परीक्षा प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून देशभर तीव्र आंदोलन पुकारण्यात आले होते. 'कॉकरोच

Odessa Port Attack : ओडेसा बंदरातील हल्ल्यानंतर भारत सतर्क; परराष्ट्र मंत्रालयाने युक्रेनच्या राजदूताला बोलावले

नवी दिल्ली : काळ्या समुद्र (ब्लॅक सी) परिसरातील भारतीय खलाशांच्या सुरक्षेबाबत भारताने मोठे राजनैतिक पाऊल उचलले

Online Share Trading Fraud : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग फसवणूक : प्रमुख बँकांना सुप्रीम कोर्टाची नोटीस

सर्वोच्च न्यायालयामुळे लाखो गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित नवी दिल्ली : ऑनलाईन शेअर ट्रेडिंग आणि डिजिटल

Rashtriya Krishi Vikas Yojana : राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या दुसऱ्या हप्त्यासाठी पात्र ठरणारे महाराष्ट्र पहिले राज्य

नवी दिल्ली : ठरवून दिलेल्या वेळेत राष्ट्रीय कृषी विकास योजना निधीचा एकूण 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी वापर

IndiGo Flight : धुराच्या इशाऱ्यानंतर दुबईहून मुंबईकडे येणाऱ्या इंडिगो विमानाचे राजकोटमध्ये सुरक्षित लँडिंग

गांधीनगर : दुबईहून मुंबईकडे येत असलेल्या इंडिगोच्या विमानाचे आज अचानक आपत्कालीन लँडिंग करावे लागले. विमानाच्या

Indian Railways Facts : ट्रेनच्या शेवटच्या डब्यावर 'X' चे चिन्ह का असते ? हे चिन्ह नसेल, तर रेल्वे कंट्रोल रूममध्ये का उडते धांदल ? पाहा रेल्वे सुरक्षेचे मोठे रहस्य!

रेल्वे प्रवास करताना बहुतांश प्रवाशांचे मुख्य ध्येय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखरूप पोहोचणे हेच असते. जर