MPSC Paper Leak : एमपीएससीच्या 'औषध निरीक्षक' भरतीतील पेपरफुटीला नवे वळण; तक्रारदाराचा 'यू-टर्न'

फेरपरीक्षा देण्यासाठी रचला बनाव?



मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक भरती प्रक्रियेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या भरती प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार करणाऱ्या व्यक्तीनेच ती तक्रार बनावट असल्याचा ई-मेल केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबंधित परीक्षा पुन्हा व्हावी यासाठीच हा बनाव रचण्यात आल्याचे तक्रारदाराने दुसऱ्या ई-मेलमध्ये म्हटल्याची चर्चा आहे.



एमपीएससीतर्फे २२ मार्च २०२६ रोजी औषध निरीक्षक भरतीची लेखी परीक्षा घेण्यात आली होती. १२ जून रोजी या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यानंतर १ ते २१ जुलै या कालावधीत यशस्वी उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आणि २२ जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. मात्र, निवड यादी जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी, म्हणजेच २३ जुलै रोजी एमपीएससीला ई-मेलद्वारे एक तक्रार प्राप्त झाली. परीक्षेपूर्वी काही प्रश्न आणि त्यांची उत्तरे व्हॉट्सॲपवर व्हायरल झाल्याचा, तसेच काही उमेदवारांचे गुण संशयास्पदरीत्या वाढल्याचा आरोप या तक्रारीत करण्यात आला होता. तक्रारदाराने व्हॉट्सॲप चॅट, कॉल रेकॉर्ड्स आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) फॉरेन्सिक तपासाची मागणीही केली होती.


तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेऊन एमपीएससीने तात्काळ पावले उचलत तक्रारदाराला सर्व उपलब्ध पुरावे सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच, संबंधित संशयित उमेदवार आणि तक्रारदाराला प्रत्यक्ष चौकशीसाठी आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. या सर्वांच्या जबाबांच्या आधारे पुढील कारवाई निश्चित केली जाणार होती.



तक्रारीवर चौकशी सुरू असतानाच, गुरुवारी रात्री या प्रकरणात नाट्यमय घडामोडी घडल्या. तक्रारदाराने एमपीएससीला आणखी एक ई-मेल पाठवून आपली पूर्वीची तक्रार बनावट असल्याचे कळवले. "जवळच्या काळात पुन्हा परीक्षा होण्याची शक्यता नसल्याने, जुनी परीक्षा रद्द करून ती पुन्हा घेतली जावी यासाठीच हा बनाव रचला होता," अशी कबुली तक्रारदाराने या ई-मेलमध्ये दिल्याची माहिती एमपीएससीतील सूत्रांनी दिली आहे. २० मार्च रोजी झालेल्या कथित संभाषणाची तक्रार तब्बल चार महिन्यांनंतर (२४ जुलै) का करण्यात आली, यामागील मूळ कारणांचा तपास आता आयोग करत आहे.



सखोल चौकशी करा - रोहित पवार


हा विषय आता सार्वजनिक झाला असून परीक्षार्थींमध्ये चिंतेचे वातावरण आहे. तक्रारदार आज काय विधान करतोय यापेक्षा आमच्याकडे आलेल्या पुराव्यांवर सरकार आणि आयोग काय कारवाई करते, हे महत्त्वाचे आहे. सोनम वांगचुक यांच्यासारख्या व्यक्तीवर उपोषण मागे घेण्यासाठी दबाव आणला जाऊ शकतो, तर मग या साध्या तक्रारदारावर दबाव आणला गेला नाही कशावरून? त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार पक्ष) आमदार रोहित पवार यांनी केली आहे.

Comments
Add Comment

Prakash Abitkar : आरोग्य समित्यांच्या माध्यमातून जनतेच्या आरोग्य समस्या जाणून घेणार

मुंबई : राज्यातील आरोग्य व्यवस्था अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि उत्तरदायी करण्यासाठी आरोग्य विभागाच्या विविध

Maharashtra Agriculture Department : महाराष्ट्राच्या कृषी विभागाची दमदार कामगिरी; केंद्र सरकारकडून राष्ट्रीय पुरस्काराने होणार सन्मान

- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे स्वीकारणार पुरस्कार मुंबई : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME)

FDA Notice to SRK : ‘विमल इलायची’ जाहिरातीवर FDAचा दणका; अजय, शाहरुख आणि टायगरला नोटीस

मुंबई : बॉलिवूड अभिनेते अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राचे

Mumbai Family Suicide : नेव्ही नगरमध्ये नौदल कर्मचाऱ्याची कुटुंबासह राहत्या घरात आत्महत्या; पोलिसांकडून तपास सुरू

मुंबई : कुलाबा येथील नेव्ही नगर परिसरात नौदल कर्मचाऱ्यासह त्याची पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाल्याची

Mumbai-Ahmedabad Bullet Train : मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन लवकरच सुरू होणार

मुंबई : मुंबई-अहमदाबाद हाय-स्पीड रेल्वे कॉरिडॉर (बुलेट ट्रेन) प्रकल्पांतर्गत मुंबईतील वांद्रे कुर्ला

Mumbai Water Storage : 'मुंबई ३' जलवाहिनीच्या दुरुस्तीनंतर मुंबईकरांसाठी जलाशयांमध्ये किती पाणीसाठी ?

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तीन हजार मिलीमीटर व्यासाच्या 'मुंबई ३' जलवाहिनीची दुरुस्ती पूर्ण झाली आहे. या