वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट ओढवल्याचे अनेकदा पाहायला मिळते. सध्या वर्धा जिल्ह्यातून एक अत्यंत महत्त्वाची आणि धास्ती भरवणारी बातमी समोर येत आहे. जिल्ह्यातील वाठोडा शिवारात एका तरुण नर वाघाचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मानव-वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी आणि अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रादेशिक वनविभाग पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आला असून, परिसरातील तब्बल १० गावांमध्ये खबरदारीचा इशारा (हाय अलर्ट) जारी करण्यात आला आहे.
घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी भरलेला एक भरधाव ट्रक चालकाचे नियंत्रण ...
१० गावांवर वाघाचे संकट, प्रशासनाकडून सतर्कता
वनविभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार, हा मुक्तसंचार करणारा वाघ अंदाजे ३ वर्ष वयोगटातील तरुण नर आहे. त्याच्या सुरक्षिततेसाठी आणि परिसरातील नागरिकांच्या संरक्षणासाठी प्रादेशिक वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी दिवस-रात्र परिसरातील जंगल पिंजून काढत आहेत. अत्याधुनिक यंत्रणेद्वारे आणि प्रत्यक्ष गस्तीव्दारे या वाघाच्या प्रत्येक हालचालीवर अत्यंत बारीक लक्ष ठेवले जात आहे. ज्या १० गावांमध्ये हा हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे, त्यात वाठोडा, धामणगाव, आमला, वाघधरा, बेलगाव, झाडगाव, लोणसावळी, शेकापूर, जोगाधरी आणि वायफड या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये सतत वाघाचा वावर असल्यामुळे घराबाहेर पडणेही नागरिकांसाठी मुश्कील झाले असून, शेतकरी व ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
मुंबई : राज्य शासनाने शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी महाराष्ट्र मोटार वाहन नियम,२०२६ अंतर्गत शालेय बस आणि व्हॅनसाठी नवीन नियम लागू ...
वनविभागाची जनजागृती आणि नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन वनविभागाकडून सतत जनजागृती मोहीम राबवली जात आहे. नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काय करावे आणि काय करू नये, याबाबत वनधिकाऱ्यांकडून सविस्तर सूचना दिल्या जात आहेत. वनविभागाने केलेल्या आवाहनानुसार:
- नागरिकांनी विशेषतः सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी शेतात जाणे टाळावे.
- जंगलात किंवा शेतात जाताना एकटे जाणे पूर्णपणे टाळावे आणि नेहमी समूहाने वावरावे.
- जनावरांच्या गोठ्यांची आणि घरांच्या आसपास विशेष काळजी घ्यावी.
वनविभागाची विशेष टीम सध्या संपूर्ण परिस्थितीवर सतत आणि डोळसपणे नजर ठेवून आहे. ग्रामस्थांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता वनविभागाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.