MPSC Paper Leak : MPSC औषध निरीक्षक परीक्षा वादाला नवे वळण; पेपरफुटीची तक्रारच बनावट असल्याचा दावा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. या परीक्षेत गैरव्यवहार झाल्याची तक्रार समोर आल्यानंतर मोठी चर्चा सुरू झाली होती. मात्र, आता ही तक्रारच खोटी असल्याचा दावा समोर आला आहे. एमपीएससीमधील सूत्रांच्या माहितीनुसार, पुन्हा परीक्षा व्हावी या उद्देशाने तक्रारदाराने कथित बनाव रचल्याची शक्यता तपासली जात आहे.



या प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली होती. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर एमपीएससीने या तक्रारीची गंभीर दखल घेत चौकशी सुरू केली. (Rohit Pawar)


मिळालेल्या माहितीनुसार, औषध निरीक्षक पदासाठीची लेखी परीक्षा 22 मार्च रोजी ऑफलाइन पद्धतीने घेण्यात आली होती. त्यानंतर 12 जून रोजी निकाल जाहीर झाला. पात्र उमेदवारांच्या मुलाखती 1 ते 21 जुलैदरम्यान पार पडल्या आणि 22 जुलै रोजी अंतिम निवड यादी प्रसिद्ध करण्यात आली. (MPSC Paper Leak)


अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतर 23 जुलै रोजी आयोगाला ई-मेलद्वारे पेपरफुटीची तक्रार प्राप्त झाली. आयोगाने तातडीने तक्रारदाराकडे पुरावे मागवले आणि तक्रारदार तसेच संबंधित उमेदवारांना चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले. (Paper leak)


दरम्यान, या प्रकरणात नवे वळण आले असून तक्रारदाराने नंतर पाठवलेल्या आणखी एका ई-मेलमध्ये यापूर्वी केलेली तक्रार खोटी असल्याचे नमूद केल्याचा दावा केला जात आहे. पुन्हा परीक्षा घेण्यात यावी, या उद्देशाने पेपरफुटीची खोटी माहिती दिल्याचे त्याने कबूल केल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. (MPSC Re Exam)


याशिवाय, कथित संभाषण 20 मार्च रोजी झाले असल्याचा दावा असताना तक्रार इतक्या उशिरा का करण्यात आली, याचाही तपास सुरू आहे. संबंधित ई-मेल, तक्रारीतील माहिती आणि इतर पुराव्यांची पडताळणी एमपीएससीकडून केली जात असून, चौकशीनंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.


Comments
Add Comment

Pune Crime : पुण्यात 1 कोटींच्या रकमेवर दरोड्याचा कट; दोन पोलिसांसह 10 जणांवर गुन्हा, 6 आरोपी फरार

पुणे: पुणे जिल्ह्यात 1 कोटी रुपयांच्या रोख रकमेवर डोळा ठेवून दरोड्याचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला

Nitesh Rane : आता गावागावांतील तलावांमध्ये होणार मत्स्यबीज संवर्धन

- मंत्री नितेश राणे यांची संकल्पना; २५ गावांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर योजना राबवणार मुंबई : राज्यातील गाव तलाव,

Water storage : खरीप हंगामावर वरुणराजाची कृपादृष्टी, नाशिकसह इतर विभागांतील पाणीसाठा किती ? 

Nashik : जून महिना कोरडा गेल्यानंतरही झालेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील बहुतांश धरणे भरली आहेत. त्यामुळे

Panic in Wardha : वर्ध्यात दहशत! १० गावांत हाय अलर्ट जारी; वनविभाग ॲक्शन मोडमध्ये

वर्धा: महाराष्ट्र आणि देशपातळीवर वन्यजीवांच्या वाढत्या वावरामुळे मानवी वस्त्यांवर आणि शेती परिसरांवर संकट

Nashik-Mumbai Highway : घोटी–सिन्नर फाटा उड्डाणपुलावर ट्रक दुभाजकाला धडकून उलटला अन्...महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

घोटी : नाशिक–मुंबई महामार्गावर (Nashik-Mumbai Highway) घोटी–सिन्नर (Ghoti Sinner) फाटा उड्डाणपुलावर आज एक भीषण अपघात घडला. विटांनी

Mumbai Pune Railway : घाटात दरड कोसळली तरी वाहतूक थांबणार नाही; मुंबई-पुणे रेल्वेप्रवास आता अधिक सुरक्षित, 'हा' मोठा बदल होणार!

मुंबई-पुणे रेल्वे प्रवाशांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी समोर आली आहे. पावसाळ्यात दरडी कोसळल्यामुळे होणारा