Dr. Mohan Bhagwat : तरुणांना सूचना देण्याऐवजी संवाद साधणे आवश्यक

सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; कुटुंबव्यवस्था बळकट करण्याचे आवाहन


मुंबई (Mumbai ): आजच्या नवीन पिढीच्या जडणघडणीसाठी पालकांनी सूचना किंवा उपदेश देण्याऐवजी मुलांशी प्रत्यक्ष संवाद साधणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी केले. भौतिक गोष्टींचा प्रभाव असणाऱ्या आणि माहितीच्या चक्रव्यूहात वाढणाऱ्या आजच्या तरुणांना कठोर पवित्र्यापेक्षा प्रेमाने व विश्वासाने गोष्टी समजावून सांगण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच घरात मोबाईलच्या अतिवापरामुळे कमी होत चाललेल्या संवादाबद्दल चिंता व्यक्त करताना, पालकांनी स्वतः आदर्श आचरणाचा वस्तुपाठ मुलांसमोर ठेवावा, असा सल्लाही त्यांनी दिला.(Dr. Mohan Bhagvat)




विश्वमांगल्य सभेच्या वतीने आयोजित ‘युगानुकूल मातृत्व’ या विषयावरील प्रबोधन बैठकीच्या समारोप सत्रात डॉ. भागवत बोलत होते. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रांतील ९०० हून अधिक प्रबुद्ध महिला उपस्थित होत्या. सरसंघचालक म्हणाले की, पूर्वीच्या काळात अनुभवाच्या आदरावर मोठ्यांचे बोलणे लगेच स्वीकारले जात असे. मात्र आज परिस्थिती वेगळी आहे. मुले सातत्याने प्रश्न विचारतात. “देवतांचा चेहरा हत्ती किंवा माकडासारखा का आहे?” अशा प्रश्नांची उत्तरे अनेकदा पालकांकडे नसतात. मुलांच्या जिज्ञासांचे निरसन करण्यासाठी पालकांनी स्वतःचे ज्ञान वाढवणे आवश्यक आहे. तसेच मुलांच्या पहिल्या १२ वर्षांतील जडणघडणीत योग्य संस्कार व्हावेत, यासाठी सुरुवातीपासूनच पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्या देवतांविषयीची शास्त्रीय व योग्य माहिती समाविष्ट केली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.(Mumbai News)








भारतीय ज्ञानपरंपरेवर विश्वास हवा


भारतीय संस्कृती आणि इतिहासाबद्दल अनेकदा जाणीवपूर्वक गैरसमज आणि भ्रम पसरवला जातो, असे सांगून डॉ. भागवत म्हणाले की, आपली ज्ञानपरंपरा प्रत्यक्ष अनुभवावर आधारित आणि अत्यंत मजबूत पायावर उभी आहे. पाश्चात्त्य जीवनशैलीचे अंधानुकरण करण्याऐवजी भारतीय दृष्टिकोनावर आधारित कुटुंबव्यवस्था व समाजव्यवस्था अधिक सुदृढ करण्याची आज गरज आहे. विविधतेत एकात्मता हेच भारतीय संस्कृतीचे मूळ तत्त्व असून, इतिहास आणि जीवनमूल्यांवर श्रद्धा ठेवून समाजाने पुढे गेले पाहिजे.
Comments
Add Comment

America Iran War : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत... इराणचा इशारा

तेहरान : अमेरिका पराभव स्वीकारत नाही तोपर्यंत सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील वाहतूक

Sourav Ganguly : फोन नंबर कोलकातामधीलच, पोलीस कारवाई करतील; जीवे मारण्याच्या धमकीवर सौरव गांगुलीची प्रतिक्रिया

कोलकाता : भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने गेल्या सहा महिन्यांपासून त्याला आणि त्याच्या कुटुंबाला

Marleshwar Temple : मार्लेश्वर मंदिरात तोकड्या व असभ्य कपड्यांमध्ये प्रवेशास बंदी

मार्लेश्वर देवस्थानचे पवित्र्य राखण्यासाठी देवस्थान ट्रस्टचा मोठा निर्णय देवरूख : राज्यातील लाखो भाविकांचे

Govinda and Sunita Ahuja Controversy : सुनीता आहुजाच्या आरोपांवर गोविंदा संतापला; म्हणाला, लिमिटमध्ये राहा...!

मुंबई : बॉलिवूड अभिनेता गोविंदा व त्याची पत्नी सुनीता आहुजा यांच्यातील वैयक्तिक वाद आता जगजाहीर होऊ लागले आहेत.

Devdutt Padikkal : पडिक्कलचे शतक, श्रीलंकेविरुद्धच्या गॉल कसोटीत पहिल्या दिवशीच भारताने केल्या एवढ्या धावा

गॉल : भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना गॉल येथे खेळवला

Chhagan Bhujbal : जातनिहाय जनगणनेची अधिसूचना जारी करणे हा सामाजिक न्यायाच्या दिशेने ऐतिहासिक निर्णय – मंत्री छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आभार पत्र मुंबई : केंद्र सरकारने जनगणना