Nashik : हरवलेला मोबाइल पुन्हा मिळेल, अशी आशा अनेक नागरिकांनी सोडून दिलेली असते. मात्र नाशिक पोलिसांनी अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवत तब्बल ८५८ हरवलेले मोबाइल त्यांच्या मूळ मालकांकडे परत सुपूर्द केले आहेत. या मोबाइलची एकूण किंमत सुमारे १ कोटी ३३ लाख रुपये आहे. नाशिक शहर पोलिसांनी (Nashik City Police) सुरू केलेल्या ‘मोबाईल ट्रेस स्पेशल युनिट’ (एमटीएसयू) या विशेष पथकाने सामान्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलवले आहे.
तांत्रिक कौशल्याच्या बळावर या पथकाने अवघ्या नऊ महिन्यांत तब्बल सव्वातीन कोटींहून अधिक किमतीचे जवळपास दोन हजार मोबाईल (Mobile) शोधून काढत ते मूळ मालकांच्या हातात सुपूर्द केले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत हे पथक आता कायमस्वरूपी कार्यान्वित ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पोलिस प्रशासनाने घेतला आहे.
दिल्ली पोलिसांच्या पथकाकडून सर्च ऑपरेशन; काही व्यक्तींना ताब्यात घेतल्याची माहिती मुंबई : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान(Dharmendra Pradhan) यांच्या ...
तांत्रिक विश्लेषण आणि मानवी कौशल्य
दरम्यान, पोलिस आयुक्तालयात आयोजित कार्यक्रमात पोलिस आयुक्त संदीप कर्णिक (Police Commissioner Sandeep Karnik) यांच्या हस्ते मोबाइल मालकांना त्यांचे हँडसेट सुपूर्द करण्यात आले. हरवलेला मोबाइल पुन्हा मिळाल्याने अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला, तर काहींच्या डोळ्यांत आनंदाश्रूही तरळले.जुलै २०२५ पासून कार्यरत असलेल्या मोबाइल शोध विशेष पथकाने तांत्रिक विश्लेषण, मानवी कौशल्य आणि सातत्यपूर्ण पाठपुराव्याच्या आधारे हे मोबाइल शोधून काढले. नागरिकांनी पोलिसांच्या या कामगिरीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे विशेष आभार मानले.
Nashik : चांदवड तालुक्यातील रायपूर, भडाणे फाटा आणि समिट परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. रविवारी मध्यरात्री तब्बल २४ शेतकऱ्यांच्या विहिरीवरील ...
नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ
या कार्यक्रमाला पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, चंद्रकांत गवळी, मोनिका राऊत, किशोर काळे यांची उपस्थिती होती. सहायक पोलिस आयुक्त तथा मोबाइल शोध विशेष पथकाचे प्रमुख संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली ही उल्लेखनीय कामगिरी पार पडली. हरवलेले मोबाइल शोधून ते मूळ मालकांपर्यंत पोहोचवण्याच्या नाशिक पोलिसांच्या या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास आणखी दृढ झाला असून, अनेक कुटुंबांना त्यांच्या मौल्यवान वस्तू पुन्हा मिळाल्याचा आनंद अनुभवता आला.






