PM's Announcement on Paper Leak : पेपर फुटीच्या खटल्यांसाठी महाराष्ट्रात दोन 'फास्ट ट्रॅक' कोर्ट; पंतप्रधानांच्या घोषणेची अंमलबजावणी

नागपूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जलद सुनावणी होणार



मुंबई : वैद्यकीय प्रवेश परीक्षा ‘नीट’सह इतर विविध स्पर्धा परीक्षांच्या पेपर फुटीप्रकरणी कठोर कारवाई करण्यासाठी आणि संबंधित खटल्यांचा लवकरात लवकर निपटारा करण्यासाठी महाराष्ट्रात दोन ‘फास्ट ट्रॅक’ न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या घोषणेच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ही न्यायालये कार्यरत असणार आहेत.



केंद्र सरकारच्या विशेष विनंतीवरून मुंबई उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष न्यायालये स्थापन करण्यात आली आहेत. उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे कार्यकारी मुख्य न्यायाधीश रवींद्र व्ही. घुगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील परीक्षांमधील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दोन प्रमुख शहरांमध्ये ही व्यवस्था करण्यात आली आहे. दिल्ली उच्च न्यायालयानेही अशाच प्रकारचे विशेष न्यायालय स्थापन करून तेथे न्यायमूर्ती अनु ग्रोव्हर बलिगा यांची नियुक्ती केली आहे. त्याच धर्तीवर आता महाराष्ट्रातही ही कार्यवाही करण्यात आली आहे.



नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील ही विशेष न्यायालये ‘सार्वजनिक परीक्षा (अन्फेअर मीन्स प्रतिबंधक) कायदा, २०२४’ तसेच ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ अंतर्गत दाखल प्रकरणांची सुनावणी घेणार आहेत. विशेष म्हणजे, २०२४ च्या नवीन कायद्यानुसार या न्यायालयांना दाखल झालेल्या खटल्यांची सुनावणी पूर्ण करून तीन महिन्यांच्या आत निर्णय देणे बंधनकारक करण्यात आले आहे.



अनुभवी न्यायाधीशांकडे जबाबदारी


या गंभीर आणि संवेदनशील प्रकरणांची सुनावणी करण्यासाठी अनुभवी न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याची सूचना केंद्र सरकारने केली होती. त्यानुसार मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजीनगर येथील विशेष न्यायालयाचे कामकाज न्यायाधीश एस. व्ही. पवार यांच्याकडे, तर नागपूर येथील न्यायालयाचे कामकाज न्यायाधीश गुलशन कोलते यांच्याकडे सोपवले आहे.

Comments
Add Comment

Government Hospitals : आता सरकारी रुग्णालयांतील ‘पेशंट’ ठरवणार डॉक्टरांचे रिपोर्ट कार्ड

राज्य सरकारचा निर्णय; हॉटेल्सप्रमाणे सरकारी दवाखान्यांनाही मिळणार स्टार रेटिंग मुंबई(Mumbai) : सरकारी रुग्णालयाचे

Asian Cup Schedule 2026 : एशियन गेम्स २०२६ चे वेळेपत्रक जाहीर, भारत-पाकिस्तान सामना कधी होणार ?

मुंबई : एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. एशियन गेम्स २०२६ क्रिकेट स्पर्धा

TRAI's MAJOR MOVE : रस्ते अपघातांना ब्रेक लावण्यासाठी 'ट्राय'चा मोठा निर्णय; काय आहे अत्याधुनिक 'V2X' तंत्रज्ञान?

नवी दिल्ली: भारतात दरवर्षी होणाऱ्या रस्ते अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे जाणवणारी जीवितहानी ही एक अत्यंत

Nashik : नाशिकच्या आध्यात्मिक वैभवात पडणार अधिक भर, द्वारका परिसरात होणार उत्तर महाराष्ट्रातील सर्वात उंच इस्कॉन मंदिर

Nashik : गोदावरीच्या पावन भूमीत आणि प्राचीन तीर्थक्षेत्र नाशिकमध्ये अध्यात्म, संस्कृती व समाजसेवेचा नवा अध्याय

Neet Paper leak : नीट पेपरफुटी प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार, दोषींना कठोर शिक्षा होणार

नवी दिल्ली : नीट पेपरफुटी प्रकरणी अटक केलेल्यांच्या विरोधात फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होणार आहे. दोषींना १०

Ind vs Afg : भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं काही घडणार

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबर २०२६ मध्ये तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली जाणार आहे. या