Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाने सीबीआय आणि ईडी यांना त्यांच्याविरोधातील उत्पन्नापेक्षा जास्त मालमत्तेच्या तक्रारीची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. या निर्णयाला आव्हान देण्यासोबतच, हे संपूर्ण प्रकरण अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून दिल्ली उच्च न्यायालयाकडे वर्ग करावे, अशी स्वतंत्र मागणीही त्यांनी याचिकेत केली आहे.



कर्नाटकातील भाजप कार्यकर्ते विघ्नेश शिशिर यांनी राहुल गांधींकडे घोषित उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता असल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाची दखल घेत उच्च न्यायालयाने मे महिन्यात सीबीआय आणि ईडीला आरोपांची पडताळणी करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने सीबीआयच्या प्रतिज्ञापत्रावर तीव्र असंतोष व्यक्त केला होता, तर ईडीने योग्य ती पावले उचलल्याचे मान्य केले होते. या प्रकरणाची अलाहाबाद उच्च न्यायालयात २० ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे.


दरम्यान, राहुल गांधींनी ७ ऑगस्ट रोजी सर्वोच्च न्यायालयात दोन स्वतंत्र याचिका दाखल केल्या आहेत. या दोन्ही याचिकांवर १७ ऑगस्ट रोजी भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. उच्च न्यायालयाचा आदेश रद्द ठरवण्याबाबत आणि खटला दिल्ली उच्च न्यायालयात स्थानांतरित करण्याबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या

Agni-5 Mk2 : अग्नी-5 Mk2 मध्ये मोठे अपग्रेड; वजन 20 टक्क्यांनी घटल्याचा दावा, वाढणार मारक क्षमता

नवी दिल्ली : भारत आपल्या संरक्षण क्षमतेत सातत्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा समावेश करत आहे. ब्रह्मोस आणि अग्नी