Shimla Accident : हिमाचलमध्ये कारवर दरड कोसळली, १३ जणांचा मृत्यू तर सहा महिन्याच्या बाळाचा...



शिमला : हिमाचल प्रदेशमधील लाहौल स्पीती परिसरातील पांगी-उदयपूर मार्गावर दुपारी एक दुर्दैवी घटना घडली आहे. घाटातून जाणाऱ्या एका टाटा सुमो कारवर दरड कोसळल्याने बाळासह १३ जणांचा मृत्यू झाला आहे. या सुमो कारमध्ये १५ जण प्रवास करत होते, त्यापैकी १३ जणांचा मृत्यू झाला आहे.






लाहौल घाटापासून ६० ते ७० किलोमीटर अंतरावर कुडूमाला परिसरात अपघात झाला आहे. घाटातून जाताना सुमो एसयूव्हीवर डोंगराचा मोठा भाग कोसळल्याने वाहतूकही ठप्प झाली होती. हा अपघात इतका भीषण होता की, कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. सुमोची फक्त नंबर प्लेट दिसत आहे. घटनेत सहा महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.भरमौर-पाँगीचे आमदार जनक राज यांनी अपघाताबाबत सविस्तर माहिती दिली. पांगी-उदयपूर मार्गावर ज्या सुमोचा अपघात त्या गाडीत १५ जण होते. गाडीतील १३ जणांचा अपघातात मृत्यू झाला, असे आमदार जनक राज यांनी सांगितले.




घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे. दरड हटवण्याचे काम हाती घेण्यात आलं आहे. अपघात इतका भीषण आहे की मृतदेहांची ओळख पटवणेही कठीण झाले आहे. डोंगरावरून दगड कोसळल्यानंतर गाडीच्या मागील भागात आग लागली, जी घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी आणि जवानांनी विझवण्याचा प्रयत्न केला. (Shimla Accident)







महामार्ग काही दिवस होता बंद 



काही दिवसांपासून उदयपूर-किलाड मार्ग बंद ठेवण्यात आला होता. यामुळे पर्यटकांची वाहने तिंदी परिसरात थांबवली जात होती. मार्ग सुरू झाल्यानंतर ही अपघाताची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी मंडी जिल्ह्यातील जोगिंद्रनगर येथील गुम्मामध्ये भूस्खलन झाले होते. या दुर्घटनेमध्ये दोन कुटुंबं मातीच्या ढिगाऱ्याखाली सापडली होती. यामध्ये एका महिलेचा मृत्यू झाला तर ७ जण जखमी झाले होते. हिमाचल प्रदेशमध्ये आठवड्याभरात दोन मोठ्या दुर्घटना झाल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Add Comment

Air India Safety : हवाई प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी घ्या, केंद्र सरकारचे एअर इंडियाला आदेश

नवी दिल्ली : फुकेतहून दिल्लीकडे येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात झालेल्या ‘टर्ब्युलन्स’ (हवेचे धक्के) आणि विमान

Rahul Gandhi News: राहुल गांधी यांची सर्वोच्च न्यायालयात धाव

नवी दिल्ली: लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका आदेशाविरोधात सर्वोच्च

Packaged Food : पॅकबंद अन्नावरील 'इशारा लेबल' प्रकरणी सुप्रीम कोर्ट संतप्त

नवी दिल्ली : पॅकबंद खाद्यपदार्थांमधील साखर, मीठ आणि सॅच्युरेटेड फॅटचे उच्च प्रमाण दाखवणारे ‘इशाऱ्याचे लेबल्स’

Independence Day : देशाच्या ८० व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी लाल किल्ला सज्ज

नवी दिल्ली : यंदा शनिवार १५ ऑगस्ट २०२६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत लाल किल्ल्यावर ८० वा

Sangeet Natak Akademi Award : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान

· महाराष्ट्रातील दहा कलावंतांचा राष्ट्रीय गौरव · संगीत, नृत्य, नाट्य व लोककलेतील योगदानाचा

Vande Mataram : वंदे मातरमच्या १५० वर्षपूर्तीनिमित्त पहिल्यांदाच लाल किल्ल्यावरून राष्ट्रीय गीत गायले जाणार

जेन-झींचं प्रतिनिधीत्व अधिक पाहायला मिळणार नवी दिल्ली : सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण मानला जाणाऱ्या