- मंत्री आशिष शेलार यांचे निर्देश; वैज्ञानिक पद्धतीने बेवारस वाहनांची विल्हेवाट लावणार
मुंबई : मुंबईतील वाढती वाहतूक कोंडी कमी करणे, रस्त्यांवर धूळ खात पडलेल्या टाकाऊ व बेवारस वाहनांची वैज्ञानिक पद्धतीने विल्हेवाट लावणे आणि राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग (Vehicle Scrapping Centre) धोरणाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेशात अत्याधुनिक 'रजिस्टर्ड व्हेईकल स्क्रॅपिंग फॅसिलिटी' उभारण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश मुंबई उपनगरचे पालकमंत्री तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी गुरुवारी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते.
राज्यात जालना, तळोजा, धाराशिव, पालघर, भिवंडी, खालापूर या ठिकाणी वाहन स्क्रॅपिंग (Vehicle Scrapping Centre) सुविधा उपलब्ध असल्या तरी मुंबईच्या हद्दीत अद्याप एकही अधिकृत केंद्र नाही. सध्या मुंबईत सुमारे ५३ लाख वाहने धावत असून त्यात १५ लाख चारचाकी, ३० लाखांहून अधिक दुचाकी आणि ५ ते ६ लाख व्यावसायिक वाहनांचा समावेश आहे. देशातील सर्वाधिक वाहन घनता मुंबईत असल्याने वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न भीषण बनला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतच स्वतंत्र स्क्रॅपिंग सुविधा असणे अत्यंत गरजेचे असल्याचे शेलार (Ashish Shelar) यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रीय वाहन स्क्रॅपिंग (Vehicle Scrapping Centre) धोरणानुसार २० वर्षांपेक्षा जुनी खासगी आणि १५ वर्षांपेक्षा जुनी व्यावसायिक वाहने फिटनेस चाचणीत अपात्र ठरल्यास स्क्रॅपसाठी पात्र ठरतात. अशा वाहनांसाठी करसवलत, नोंदणी शुल्कात सूट आणि वाहनाच्या मूळ किमतीच्या ४ ते ६ टक्के स्क्रॅप मूल्य देण्याची तरतूद आहे. त्यामुळे मुंबईतील बेवारस वाहनांची विल्हेवाट लावण्यासाठी हे केंद्र मैलाचा दगड ठरेल.
नापास विद्यार्थ्यांना पास करण्याचा 'मविआ'चा पराक्रम मुंबई : "महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठा शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घोटाळा उद्धव ठाकरे ...
पाच एकर जागेवर पीपीपी तत्त्वावर उभारणी :
या प्रकल्पासाठी मुंबई महानगरपालिका किंवा राज्य शासनाच्या उपलब्ध जागेवर सुमारे पाच एकर क्षेत्रात सार्वजनिक-खासगी भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर हे स्क्रॅपिंग केंद्र (Vehicle Scrapping Centre) उभारण्याचा प्रस्ताव तातडीने तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यासाठी इच्छुक उद्योजकांकडून स्वारस्य अभिव्यक्ती मागवून पालिकेने निविदा प्रक्रिया राबवावी, तसेच परिवहन विभाग व वाहतूक पोलिसांनी यात योग्य समन्वय ठेवावा, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी (Ashish Shelar) दिल्या आहेत.






