आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सोयीसुविधांसाठी शिवसेना कटिबद्ध; वारकऱ्यांसाठी यंदा प्रथमच एअर अँम्ब्युलन्स सेवा, बाइक अँम्ब्युलन्स
Nashik : टी.जे.एस.बी. सहकारी बँकेची (T.J.S.B. Sahakari Bank) तब्बल ३८ कोटी रुपयांची कथित फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या बाफना ज्वेलर्सचे (Bafna Jewellers) संचालक निलेश ...
मुंबई: शिवसेना मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार शिवसेनेकडून सुरु असलेल्या ‘आनंद वारी’ला लाखो वारकऱ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. आषाढ वारी सोहळ्यात पालखी मार्गांवर शिवसेनेच्या वतीने सुरु केलेल्या आरोग्य सुविधांचा आणि निर्मल वारीचा लाखो वारकऱ्यांनी लाभ घेतल्याची माहिती शिवसेनेच्या राष्ट्रीय सचिव व प्रवक्त्या शायना एन.सी यांनी आज दिली. बाळासाहेब भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शायना एन.सी यांनी आषाढी वारीतील त्यांचे अनुभव सांगितले.
- सलग दोन हल्ल्यांमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण; वनविभागाच्या तत्पर कारवाईमुळे गावकऱ्यांनी सोडला सुटकेचा निश्वास बुलढाणा\गिरडा : गिरडा ...
त्या म्हणाल्या की मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी वारकऱ्यांसाठी आणि आषाढ वारीसाठी अनेक मोठे निर्णय घेतले. तेव्हा सुरु केलेल्या निर्मल वारीला वारकऱ्यांकडून आजही चांगला प्रतिसाद मिळत आहे. वारीतील नोंदणीकृत दिंडीला २० हजार रुपयांचे अनुदान सुरु करण्यात आले. याबद्दल वारीतील अनेक दिंडीप्रमुखांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले. तसेच वारकऱ्यांसाठी ५ लाख रुपयांचा विमा, वारकरी महामंडळासाठी ५० कोटींचा निधी देण्यात आला. या महामंडळाच्या माध्यमातून ज्येष्ठ वारकऱ्यांना पेन्शन, इंद्रायणी, चंद्रभागा आणि गोदावरी या नद्या प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात येणार आहे. पालखी मार्गाच्या विस्तारासाठी आणि विकासासाठी तत्कालीन मुख्यमंत्री शिंदे यांनी मोठे निर्णय घेतले. त्याचा फायदा आज वारीतून दिसत आहे, असे शायना एन.सी म्हणाल्या.
गुजरातसह उत्तर आणि ईशान्य भारतात पावसाचे थैमान नवी दिल्ली : जुलै महिन्याच्या सुरुवातीला काहीसा मंदावलेला नैऋत्य मान्सून आता देशभरात पूर्णपणे ...
निर्मल वारी अभियानासाठी ३६.७१ कोटींची तरतूद करण्यात आली. वारकऱ्यांना स्वच्छ पाणी, स्वच्छता गृहे, निवारा आणि सुरक्षेसाठी प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत. भजनी मंडळांना अनुदान दिल्याचे शायना एन.सी यांनी सांगितले.
मध्यस्थ कमी होऊन सेवा अधिक पारदर्शक होणार https://prahaar.in/2026/07/23/pmfby-revised-pradhan-mantri-fasal-bima-yojana-implemented-in-maharashtra-for-2026-27-appeal-made-apply-by-july-31/ मुंबई : महाराष्ट्र शासन आणि केंद्रीय सहकार मंत्रालय ...
त्यापुढे म्हणाल्या की यंदा वारीत प्रथमच एअर अँम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आली आहे. शिवसेना संसदीय पक्षाचे नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे स्वत: वारीवर लक्ष ठेवून असून त्यांच्या सूचनांनुसार शिवसेना डॉक्टर्स सेलचे १३०० ते १५०० डॉक्टर्स आषाढ वारीत कार्यरत आहेत. त्याचबरोबर ३०० नियमित अँम्ब्युलन्स, २४ कार्डियाक अँम्ब्युलन्स, २२ आयसीयू अँम्ब्युलन्स वारकऱ्यांच्या मुक्कामाच्या ठिकाणी उपलब्ध करण्यात आल्याची माहिती शायना एन.सी यांनी दिली. महिला वारकऱ्यांसाठी हिरकणी कक्ष असून तेथे स्त्रीरोग तज्ज्ञांची विशेष पथके आहेत. गर्दीच्या ठिकाणी बाईक अँम्ब्युलन्स देखील उपलब्ध केल्याची माहिती शायना एन.सी यांनी दिली. त्यांनी पायी वारी करुन वारकऱ्यांशी संवाद साधला आणि शिवसेनेने सुरु केलेल्या आनंद वारी उपक्रमाविषयी वारकऱ्यांची मते जाणून घेतली. विविध योजनांच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध असल्याची ग्वाही शायना एन.सी यांनी दिली.





