Monsoon Update : देशात पावसाची ३२ टक्के तूट, अनेक ठिकाणी खरिपाची पेरणी संकटात

नवी दिल्ली : जुलै महिना संपायला दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधी उरला आहे. अद्याप देशात अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. ताज्या आकडेवारीनुसार देशात पावसाची ३२ टक्के तूट आहे. अपुऱ्या पावसामुळे खरिपाची शेती संकटात सापडली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप पिकांच्या पेरणीचे क्षेत्र ४.२ दशलक्ष हेक्टरने कमी झाले आहे. यामुळे यंदाच्या अन्न उत्पादनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे.



पावसाअभावी शेतकरी आणि सरकार चिंतेत आहे. दरवर्षी जून - जुलै दरम्यान देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खरिपातील शेतीची कामं होतात. पेरणी आणि नंतरची शेतीची कामं मोठ्या प्रमाणावर केली जातात. पण यंदा अपेक्षेप्रमाणे पाऊस पडलेला नाही. याचा प्रतिकूल परिणाम शेतीवर झाला आहे. पिण्याच्या पाण्याच्या साठ्यावरही प्रतिकूल परिणाम झाला आहे. यामुळे यंदाच्या वर्षीच्या पाण्याच्या नियोजनाच्या बाबतीत प्रशासकीय यंत्रणा चिंतेत आहे.



ताज्या आकडेवारीनुसार दक्षिण द्वीपकल्पीय भारतात सरासरीपेक्षा २६ टक्के, वायव्य भारतात १८ टक्के, आणि मध्य भारतात १३ टक्के पावसाची तूट आहे. पावसाच्या तुटीचा फटका शेतीच्या कामांवर झाला आहे.


केंद्रीय कृषी मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार १७ जुलै २०२६ पर्यंत देशभरात खरीप हंगामात महत्त्वाच्या पिकांची एकूण ६५८.१९ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२.२८ लाख हेक्टरने कमी आहे. मागच्या वर्षी म्हणजेच २०२५ मध्ये १७ जुलैपर्यंत देशात खरीप पिकांची एकूण ७००.४७ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती.


यंदा कडधान्य पिकाच्या पेरणी क्षेत्रात सर्वाधिक घट झाली आहे. यंदा जेमतेम १२.२९ लाख हेक्टर शेतात कडधान्यांची पेरणी झाली आहे. तेलबिया पिकांखालील क्षेत्रात ८.६३ लाख हेक्टर घट झाली आहे. भाताच्या पेरणीतही १.४१ लाख हेक्टरने घट झाली आहे.


वेधशाळेच्या ताज्या अहवालानुसार मान्सून पुढी चार दिवस वायव्य आणि ईशान्य भारतात सक्रीय असेल. पण पुढील सात दिवस पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारताचा पावसाचा जोर कमी राहण्याची शक्यता आहे. जर पश्चिम-मध्य आणि दक्षिण द्वीपकल्पीय भारतामध्ये, जिथे आधीच मान्सूनची कमतरता आहे, पावसाची परिस्थिती सुधारली नाही, तर शेती मोठ्या संकटात सापडण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment

ISRO Recruitment 2026 : ISRO मध्ये थेट भरती! ४६२ अप्रेंटिस पदांसाठी २५ जुलैला थेट 'वॉक-इन इंटरव्यू'

तिरुवनंतपुरम : भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) काम करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक मोठी आणि सुवर्णसंधी

INS Malvan : भारतीय नौदलाची ताकद वाढली; नौदलाच्या ताफ्यात आता स्वदेशी पाणबुडीविरोधी युद्धनौका 'मालवण' दाखल

- नौदलाची सागरी सुरक्षा आणि पाणबुडीविरोधी क्षमता होणार आणखी बळकट नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात आणखी

NEET TOPPER : नीट २०२६ टॉपर आर्यन गुप्ताची विशेष मुलाखत; प्रोटेस्टवर मला काहीच बोलयचं नाही, पण...

Panjab : NEET 2026 परीक्षेत ७२० पैकी तब्बल ७१५ गुण मिळवून ऑल इंडिया रँक-१ (AIR 1) पटकावणारा पंजाबचा आर्यन गुप्ता हा सध्या सर्वत्र

New Delhi Metro : दिल्लीत हाय अलर्ट : CJP च्या आंदोलनामुळे १६ मेट्रो स्टेशन बंद; प्रवाशांची मोठी गैरसोय

राजधानीत सुरक्षेत मोठी वाढ; वाहतुकीला मोठा फटका नवी दिल्ली : दिल्लीमध्ये सध्या सुरू असलेल्या CJP आंदोलनामुळे

Anantnag terror attack : जम्मू-काश्मीर : अनंतनागच्या लाल चौकात भरदिवसा गोळीबार, पोलीस जवानाला वीरमरण

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग शहरात बुधवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. येथील

Kangana Ranaut : 'पंतप्रधान मोदी जगात सर्वात लोकप्रिय, त्यांनी राजीनामा का द्यावा?'; कंगना रनौत यांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल!

नवी दिल्ली : सध्या देशात 'नीट' (NEET) परीक्षेच्या मुद्द्यावरून चर्चा सुरू आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याबाबत