सचिन धानजी
मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी (Lakes) तानसा तलाव बुधवारी २२ जुलै रोजी वाहू लागला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता वाहू लागला अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.त्यामुळे वर्षाच्या तुलनेत यंदा एक दिवस आधीच तानसा तलावाने भरून वाहण्याची किमया साधली. मागील वर्षी २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला होता.
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. बुधवारी पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९,५९०.० कोटी लीटर (८,९५,९०७ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ६१.९०टक्के इतका आहे.

दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीलाच नीट (NEET) पेपर लीक प्रकरणावरून विरोधकांनी केंद्र सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. अशा ...
संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्त्वाचा असणारा तानसा तलाव बुधवारी सकाळी ८.५१ वाजेच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. तानसा धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,४९४.६ कोटी लीटर अर्थात १४४,९४६ दशलक्ष लीटर इतकी आहे. यापूर्वी विहार आणि तुळशी तलाव एकच दिवशी भरून वाहू लागले आहेत.
हा तलाव (Lake) यापूर्वी कधी किती वाजता भरला होता..
- २२ जुलै २०२६, सकाळी ८.३० मिनिटे
- २३ जुलै २०२५, सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटे
- २४ जुलै २०२४, सकाळी
- २६ जुलै २०२३ पहाटे ४.३० वाजता
- १४ जुलै २०२२ रात्री ८.५० वाजता,
- २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता,
- २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता