Mumbai Lake : मुंबईला पाणीपुरवठा करणारा तानसा तलावही ओसंडून वाहू लागला

सचिन धानजी


मुंबई : मुंबईला (Mumbai) पाणीपुरवठा करणा-या ७ तलावांपैकी (Lakes) तानसा तलाव बुधवारी २२ जुलै रोजी वाहू लागला. बुधवारी सकाळी साडेआठ वाजता वाहू लागला अशी माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जल अभियंता खात्याद्वारे देण्यात आली आहे.त्यामुळे वर्षाच्या तुलनेत यंदा एक दिवस आधीच तानसा तलावाने भरून वाहण्याची किमया साधली. मागील वर्षी २३ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटांनी हा तलाव ओसंडून वाहू लागला होता.


मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या ७ धरणांची एकूण कमाल पाणी साठवण क्षमता ही सुमारे १,४४,७३६.३ कोटी लीटर (१४,४७,३६३ दशलक्ष लीटर) इतकी आहे. बुधवारी पहाटे ६ वाजताच्या मोजणीनुसार सर्व ७ तलावांमध्ये मिळून ८९,५९०.० कोटी लीटर (८,९५,९०७ दशलक्ष लीटर) इतका जलसाठा उपलब्ध आहे. हा जलसाठा एकूण जलसाठ्याच्या अर्थात १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटरच्या तुलनेत ६१.९०टक्के इतका आहे.





संपूर्ण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांपैकी महत्त्वाचा असणारा तानसा तलाव बुधवारी सकाळी ८.५१ वाजेच्या सुमारास ओसंडून वाहू लागला आहे. तानसा धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तानसा तलावाची कमाल जलधारण क्षमता १४,४९४.६ कोटी लीटर अर्थात १४४,९४६ दशलक्ष लीटर इतकी आहे. यापूर्वी विहार आणि तुळशी तलाव एकच दिवशी भरून वाहू लागले आहेत.



हा तलाव (Lake) यापूर्वी कधी किती वाजता भरला होता..



  • २२ जुलै २०२६, सकाळी ८.३० मिनिटे

  • २३ जुलै २०२५, सायंकाळी ५ वाजून ४० मिनिटे

  • २४ जुलै २०२४, सकाळी

  • २६ जुलै २०२३ पहाटे ४.३० वाजता

  • १४ जुलै २०२२ रात्री ८.५० वाजता,

  • २२ जुलै २०२१ रोजी पहाटे ०५.४८ वाजता,

  • २० ऑगस्ट २०२० रोजी सायंकाळी ७.०५ वाजता


 
Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Radhakrishna Vikhe Patil : धरण क्षेत्रात मत्स्य व्यवसाय विकासासाठी सर्वेक्षण करणार

मुंबई : जलसंपदा विभाग आता मत्स्य व्यवसाय विकास विभागाशी सहक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

Nitesh Rane : मच्छीमार बांधवांसाठी आधुनिक व सर्व सुविधांयुक्त वास्तू उभारणार – मंत्री नितेश राणे

· मरोळ मच्छी मार्केटच्या विकासकामांना गती देणार मुंबई, दि. 12: मुंबईतील मच्छीमार बांधवांसाठी महत्त्वपूर्ण

Water Metro : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अर्थसंकल्पाला मंजुरी; वॉटर मेट्रोसह विविध प्रकल्पांना मिळणार गती

मुंबई : महाराष्ट्राच्या सागरी क्षेत्रातील पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने अनेक