मुंबई : शाळा (School) म्हटलं की डोळ्यांसमोर उभं राहतं ते वर्गखोल्या (Classroom), फळ्यावरचं लेखन (Blackboard), प्रार्थना (Prayer), मधल्या सुट्टीतील गोंधळ आणि विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवणारे शिक्षक (Teachers). अशाच एका प्रेरणादायी शिक्षिकेची कथा आता स्टार प्रवाह (Star Pravah) प्रेक्षकांसमोर घेऊन येत आहे. 'आमच्या लाडक्या नाईक बाई' (Amchya Ladkya Naik Bai) या नव्या मालिकेत (Serial) अभिनेत्री (Actress) ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) तब्बल आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहवर पुनरागमन (Comeback) करत आहेत.
या मालिकेत ऐश्वर्या नारकर 'नाईक बाई' ही मुख्य भूमिका (Lead Role) साकारणार आहेत. नाईक बाईंसाठी शाळा ही केवळ चार भिंतींची इमारत नसून ते एक मोठं कुटुंब आहे. विद्यार्थ्यांचं शिक्षण (Education), संस्कार (Values) आणि आत्मविश्वास (Confidence) घडवणं हेच त्यांचं ध्येय आहे. घर, संसार आणि वैयक्तिक आयुष्यातील अडचणींचा सामना करत त्या प्रत्येक विद्यार्थ्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसणार आहेत.
मुंबई : ‘रात्रीस खेळ चाले’ (Ratris Khel Chale) या लोकप्रिय मालिकेतील ‘शेवंता’ (Shevanta) या भूमिकेमुळे अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर (Apoorva Nemlekar) घराघरात पोहोचली. मात्र, काही ...
या भूमिकेबद्दल बोलताना ऐश्वर्या नारकर म्हणाल्या, "आठ वर्षांनंतर स्टार प्रवाहच्या कुटुंबात परतताना खूप आनंद होत आहे. 'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही केवळ एक व्यक्तिरेखा नाही, तर प्रत्येकाच्या आयुष्यात भेटलेल्या त्या समर्पित शिक्षिकेचं प्रतिबिंब आहे, ज्या स्वतःच्या सुख-दुःखाचा विचार न करता विद्यार्थ्यांचं भविष्य घडवण्यासाठी झटत असतात. नाईक बाईंचं विद्यार्थ्यांवरील प्रेम आणि प्रत्येक मुलामधील उज्ज्वल भविष्य पाहण्याची त्यांची दृष्टी मला खूप भावली."
त्या पुढे म्हणाल्या, "आजही आपण आपल्या आवडत्या शिक्षकांना प्रेमाने आठवतो. माझ्यासाठीही आईनंतर शिक्षिकांना खूप महत्त्वाचं स्थान आहे. त्यांनी दिलेलं प्रेम, शिकवलेल्या गोष्टी आणि त्यांच्याशी जपलेलं नातं आजही कायम आहे. त्यामुळे नाईक बाई ही भूमिका माझ्यासाठी अत्यंत खास आहे."
'आमच्या लाडक्या नाईक बाई' ही कौटुंबिक (Family) आणि प्रेरणादायी (Inspirational) मालिका १० ऑगस्टपासून दररोज सायंकाळी ६:३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित (Telecast) होणार आहे. शिक्षिका आणि विद्यार्थ्यांमधील नातं, संस्कारांची ताकद आणि आयुष्य घडवणाऱ्या गुरुंची कहाणी या मालिकेतून उलगडणार आहे.





