Sonam Wangchuk - J P Nadda : २३ दिवसांनंतर सोनम वांगचुक यांचे उपोषण अखेर संपले! जे. पी. नड्डांसोबत चर्चेनंतर मोठा निर्णय

नवी दिल्ली : तब्बल २३ दिवसांपासून सुरू असलेल्या आमरण उपोषणाला पर्यावरणवादी आणि शिक्षण सुधारणा चळवळीचे प्रमुख सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी अखेर सोमवारी पूर्णविराम दिला. केंद्रीय आरोग्यमंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J P Nadda) यांच्यासोबत आंदोलनाच्या प्रतिनिधींची महत्त्वपूर्ण बैठक झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. सरकार आणि आंदोलनकर्त्यांमध्ये सकारात्मक संवाद सुरू झाल्याने वांगचुक यांनी उपोषण मागे घेत असल्याची घोषणा केली.



प्रकृती खालावल्याने रुग्णालयात उपचार :


सततच्या उपोषणामुळे वांगचुक (Sonam Wangchuk) यांची प्रकृती गंभीररीत्या खालावली होती. १८ जुलै रोजी त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शरीरात पाण्याची कमतरता (डिहायड्रेशन), पोटॅशियमची धोकादायकरीत्या घटलेली पातळी आणि वाढलेले केटोन यांसारखी गंभीर लक्षणे आढळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तातडीने वैद्यकीय उपचार सुरू केले.



जे. पी. नड्डा यांनी दिली चर्चेची माहिती :


आंदोलनकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जे. पी. नड्डा (J P Nadda) यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स' वर माहिती देत सांगितले की, सरकार आणि आंदोलनकर्त्यांमधील चर्चा अत्यंत सकारात्मक आणि सौहार्दपूर्ण वातावरणात झाली. त्यांच्या म्हणण्यानुसार, सोमवारी सकाळी प्रथमच आंदोलनकर्त्यांकडून सरकारशी औपचारिक संवाद साधण्याचा प्रस्ताव आला. त्यानंतर सकाळी सुमारे ११.५० वाजता चर्चा सुरू झाली. सुरुवातीला अनौपचारिक संवाद झाला आणि नंतर शिष्टमंडळासोबत सविस्तर बैठक पार पडली.


नड्डा (J P Nadda) यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्यांनी दुपारी सुमारे ४ वाजता लेखी निवेदन सादर केले. त्यानंतर त्यांनी आंदोलनकर्त्यांना उपोषण मागे घेण्याचे आणि संवादाच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.



अभिजीत दिपके यांनीही उपोषण मागे घेतले :


दरम्यान, कॉकरोच जनता पार्टी (CJP) चे संस्थापक अभिजीत दिपके यांनीही आपले बेमुदत उपोषण समाप्त केले. सोनम वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर १८ जुलैपासून त्यांनीही उपोषण सुरू केले होते. कथित NEET परीक्षेतील गोंधळानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांचे आवाहन आणि स्वतः सोनम वांगचुक यांच्या विनंतीनंतर त्यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र, शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता आणि सुधारणा घडवून आणण्यासाठीचा लढा सुरूच राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.



'चलो संसद' आंदोलनाला मोठा प्रतिसाद :


संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी आयोजित करण्यात आलेल्या 'चलो संसद' आंदोलनात हजारो विद्यार्थी, युवक आणि विविध सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले. जंतर-मंतरवरून संसदेकडे निघालेल्या मोर्चामुळे राजधानीत तणावाचे वातावरण निर्माण झाले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संसद परिसरासह मध्य दिल्लीतील संवेदनशील भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.



सरकारने जबाबदारी स्वीकारावी, अशी प्रमुख मागणी :


उपोषण संपवण्यापूर्वी सोनम वांगचुक यांनी स्पष्ट केले होते की, प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांसह शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींची नैतिक जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारावी, किंवा किमान पावसाळी अधिवेशनात शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्व आणि परीक्षा सुधारणांवर गंभीर चर्चा करण्याचे आश्वासन द्यावे.


सरकारशी संवादाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर वांगचुक यांनी उपोषण मागे घेतले असले, तरी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, विद्यार्थ्यांना न्याय आणि शिक्षण व्यवस्थेतील व्यापक सुधारणा यासाठीचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment

NEET PG exam : कडक सुरक्षा आणि थेट प्रत्यक्ष देखरेखीत झाली नीट-पीजी परीक्षा

नवी दिल्ली : नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (एनबीईएमएस) या राष्ट्रीय वैद्यकीय विज्ञान परीक्षा

MK Stalin Security Downgraded : तामिळनाडू सरकारचा निर्णय, माजी मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या सुरक्षेत कपात

चेन्नई : तामिळनाडू पोलिसांनी सुरक्षा प्राप्त राजकीय नेत्यांना असलेल्या धोक्याचे वेळोवेळी केलेल्या आकलनानंतर

IST Mandatory 2027 : मार्च २०२७ पासून देशभरात इंडियन स्टँडर्ड टाइम बंधनकारक

नवी दिल्ली : देशातील सर्व संस्था, कंपन्या आणि संबंधित आस्थापनांना मार्च २०२७पासून कायदेशीर, व्यावसायिक, डिजिटल

Manjit Kaur : लिव्ह-इन पार्टनरच्या अत्याचारानंतर ५४ दिवस मृत्यूशी झुंज; सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौरचा मृत्यू

मनजीत कौरचा लिव्ह-इन पार्टनर आणि त्याच्या एका साथीदाराच्या क्रूरतेनंतर ५४ दिवस रुग्णालयात जिद्दीने जगण्यासाठी

India Nepal Flood Relief Operation : नेपाळच्या पूरस्थितीत भारताची मदतकार्य मोहीम तीव्र; १०८ भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका

नवी दिल्ली : नेपाळमध्ये २६ ऑगस्ट रोजी भोटेकोशी परिसरात आलेल्या विनाशकारी पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले

Nepal Flood : नेपाळमध्ये महापुराचा कहर! ६ जलविद्युत प्रकल्पांमध्ये ५०० हून अधिक जण अडकले; बचावकार्याला खराब हवामानाचा अडथळा

डेहराडून : नेपाळमध्ये आलेल्या भीषण आणि विनाशकारी पुरानंतर परिस्थिती अद्याप गंभीर आहे. फ्लॅश फ्लडचा सर्वाधिक