नवी दिल्ली : सीमावर्ती पिथौरागढ जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून ऐतिहासिक कैलास मानसरोवर यात्रा मार्ग सलग दुसऱ्या दिवशीही पूर्णपणे बंद राहिला आहे. मोठ्या प्रमाणावर झालेल्या भूस्खलनामुळे आणि रस्त्यावर आलेल्या मलब्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.मार्ग बंद असल्याने गर्बाधारच्या पुढे २०० हून अधिक प्रवासी अडकून पडले आहेत. रस्ता पूर्णपणे नुकसानग्रस्त झाल्यामुळे कैलास मानसरोवर यात्रेकरूंच्या विविध तुकड्यांना वेगवेगळ्या मुक्कामस्थळी थांबण्यास भाग पडले आहे.
वॉशिंग्टन : जॉर्डनमध्ये झालेल्या इराणी हल्ल्यात दोन अमेरिकी सैनिकांचा मृत्यू झाल्यानंतर अमेरिकेने रविवारी इराणविरोधात नवीन हवाई हल्ले केले. हे ...
जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या कैलास मानसरोवर यात्रेसाठी निघालेले चौथे पथक मोठ्या अडथळ्यांमुळे धारचुला येथेच थांबविण्यात आले आहे. मार्ग सुरळीत झाल्यानंतर आणि प्रशासनाकडून परवानगी मिळाल्यानंतरच या पथकाला गुंजीकडे रवाना करण्यात येणार आहे. दुसरीकडे, यात्रा पूर्ण करून परतणारे पहिले पथकही मार्ग बंद असल्याने गुंजी येथेच अडकले आहे.सीमावर्ती भागात शनिवारी सायंकाळपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. आपत्ती नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार, धारचुला येथे सर्वाधिक ९२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जिल्हा मुख्यालय पिथौरागढ येथे ५८ मिलिमीटर आणि डीडीहाट येथे ५३ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली.मुसळधार पावसामुळे तवाघाट-गुंजी आणि थल-मुनस्यारी या प्रमुख मार्गांसह जिल्ह्यातील १७ अंतर्गत ग्रामीण रस्ते मलबा साचल्याने बंद झाले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात अद्यापही पाऊस सुरू असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. (Kailash Mansarovar Yatra)






