Pratap Sarnaik : एसटीचा प्रवास महागला; १३.५६ टक्के भाडेवाढ; डिझेल दरवाढीसह वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

मुंबई : ग्रामीण महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बस प्रवासाच्या तिकिटांचे दर आता वाढणार आहेत. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावाला अंतिम मान्यता दिली आहे. अखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, कर्मचाऱ्यांच्या भत्त्यांमधील वाढ आणि गाड्यांच्या देखभालीचा वाढता खर्च यांमुळे हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शुक्रवारी दिली. या नव्या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला झळ बसणार असली, तरी यापूर्वी लागू केलेली १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (Pratap Sarnaik)



वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना अविरत सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कामकाजावर प्रचंड आर्थिक ताण निर्माण झाला होता. त्यामुळे ही सार्वजनिक सेवा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाला अखेर दरवाढीचा निर्णय घ्यावा लागला आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यासोबतच एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यामुळे महामंडळाचा एकूणच परिचालन खर्च वाढला आहे.







महाराष्ट्र राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीमुळे डिझेल, सुटे भाग आणि टायर यांच्या किमती वाढल्याने ही वाढ अपरिहार्य ठरली. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी एसटीवर दाखविलेला विश्वास नेहमीप्रमाणे कायम ठेवावा.- प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री

Comments
Add Comment

Mumbai News : गृहनिर्माण सोसायट्यांनी पदपथांवरील रॅम्प, अतिक्रमणे तातडीने हटवावेत; अन्यथा कठोर कारवाई

महापालिका आयुक्तांचे इशारावजा आवाहन मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील पदपथ हे नागरिकांना सुरक्षितपणे आणि

Mumbai Mandai News : मुंबईतील मंड्यांच्या पुनर्विकासासाठी धोरणात्मक घेणार निर्णय

स्थायी समितीच्यावतीने होणार विशेष बैठक मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईतील अनेक मंडईंचा पुनर्विकास रखडलेला असून

Reay Road Railway Bridge : पूल विभागाचे अधिकारी गैरहजर, रे रोड रेल्वेवरील पुलाच्या वाढीव कामाचा प्रस्ताव केला दप्तरी दाखल

स्थायी समितीने व्यक्त केली तीव्र नाराजी मुंबई (विशेष प्रतिनिधी) : मुंबईत अनेक पुलांची तसेच उड्डाणपुलांची कामे

BMC News : जन्म व मृत्यूशी संबंधित विविध अर्जांची नोंद आता स्वतंत्र संगणकात; जुने जन्म / मृत्यू प्रमाणपत्र नवीन क्युआर कोडयुक्त प्रमाणपत्र

स्वतंत्र खिडकीद्वारे स्वीकारणार अर्ज https://prahaar.in/2026/08/06/residents-of-worli-prabhadevi-and-lower-parel-will-face-garbage-related-issues-for-3-to-4-days/ मुंबई (विशेष प्रतिनिधी) :

Water Supply Cut News : वांद्रे पूर्व ते अंधेरी पूर्व भागांत येत्या मंगळवार, बुधवार पाणीकपात

मुंबई (विशेष प्रतिनिधी) अंधेरी पूर्व ते वांद्रे पूर्व के दक्षिण आणि एच पूर्व विभागातील पाणीपुरवठा

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी