Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा


मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी राज्यावरील पाणीटंचाईचे संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. प्रमुख धरणक्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली असली तरी, राज्यातील प्रमुख दहा धरणांतील उपयुक्त पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी कमी आहे. पावसाचे असमान वितरण आणि भूजल पातळीतील घसरणीमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७३७ गावे आणि १ हजार ९१८ वाड्यांना आजही ७९० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्यास राज्यात पाणी आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



राज्यातील कोयना, जायकवाडी, उजनी, पेंच प्रकल्प समूह, गोसीखुर्द, खडकवासला, मुठा, अप्पर वर्धा, भंडारधारा आणि इसापूर या प्रमुख दहा धरणांमध्ये सध्या १८४.४७ टीएमसी (४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा २७८.४४ टीएमसी इतका होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा घटल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक विभागात पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर असून, तिथे सर्वाधिक ३०० टँकर्सद्वारे पाणी पुरवले जात आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 'जैसे थे' आहे. (Water Crisis)



मुंबईची स्थिती काय?


दुसरीकडे, मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा मात्र तुलनेने समाधानकारक आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलचिंता काहीशी कमी झाली आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एक टक्का कमी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यास मुंबईच्या पाणी नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Mumbai Update)

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर