Water crisis : पावसाच्या लपंडावामुळे राज्यावरील जलसंकट कायम

 गेल्या वर्षापेक्षा १२ टक्के कमी साठा; २२ जिल्ह्यांतील ७३७ गावांना आजही टँकरचा आसरा


मुंबई : राज्याच्या बहुतांश भागात गेल्या आठवड्यात पावसाने दमदार हजेरी लावली असली, तरी राज्यावरील पाणीटंचाईचे संकट अद्याप पूर्णपणे दूर झालेले नाही. प्रमुख धरणक्षेत्रात काही प्रमाणात पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात किरकोळ वाढ झाली असली तरी, राज्यातील प्रमुख दहा धरणांतील उपयुक्त पाणीसाठा गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल १२ टक्क्यांनी कमी आहे. पावसाचे असमान वितरण आणि भूजल पातळीतील घसरणीमुळे राज्यातील २२ जिल्ह्यांतील ७३७ गावे आणि १ हजार ९१८ वाड्यांना आजही ७९० टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करावा लागत आहे. पावसाने पुन्हा ओढ दिल्यास राज्यात पाणी आणीबाणी निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.



राज्यातील कोयना, जायकवाडी, उजनी, पेंच प्रकल्प समूह, गोसीखुर्द, खडकवासला, मुठा, अप्पर वर्धा, भंडारधारा आणि इसापूर या प्रमुख दहा धरणांमध्ये सध्या १८४.४७ टीएमसी (४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा आहे. गेल्या वर्षी याच काळात हा साठा २७८.४४ टीएमसी इतका होता. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाणीसाठा घटल्यामुळे चिंता वाढली आहे. नाशिक विभागात पाण्याची परिस्थिती अधिकच गंभीर असून, तिथे सर्वाधिक ३०० टँकर्सद्वारे पाणी पुरवले जात आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पावसाचे प्रमाण अद्याप समाधानकारक नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न 'जैसे थे' आहे. (Water Crisis)



मुंबईची स्थिती काय?


दुसरीकडे, मुंबई आणि ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा मात्र तुलनेने समाधानकारक आहे. मुंबई महानगर प्रदेशात (एमएमआर) मागील आठवड्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे जलचिंता काहीशी कमी झाली आहे. मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या सहा धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत केवळ एक टक्का कमी पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असली तरी पावसाने दीर्घ विश्रांती घेतल्यास मुंबईच्या पाणी नियोजनावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असा इशारा वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिला आहे. (Mumbai Update)

Comments
Add Comment

Bandra kidnapping : घराबाहेरून अचानक बेपत्ता झाल्या मुली; मुंबई पोलिसांच्या एका गुप्त फोन कॉलने आणि...

मुंबईतून अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुलींची उत्तराखंडमधून सुखरूप सुटका; आरोपी अटकेत मुंबई : मुंबईच्या वांद्रे

Nitesh Rane : नवी मुंबई ते सिंधुदुर्ग विमानसेवा १५ ऑगस्टपासून - पालकमंत्री नितेश राणे

- गणेशोत्सवापूर्वी कोकणवासीयांना मोठा दिलासा मुंबई : गणेशोत्सव अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाच, मुंबईत

SIR Form : मतदारांसाठी दिलासा! राज्यातील निवडणूक आयोगाच्या SIR मोहिमेला दहा दिवसांची मुदतवाढ

मुंबई : मतदार यादी अधिक अचूक आणि अद्ययावत करण्यासाठी सुरू असलेल्या विशेष सखोल पुनरिक्षण (maharashtra  - SIR) अभियानाला

Mumbai Water Stock : मुंबईला दिलासा! तलावक्षेत्रात मुसळधार पाऊस; जलसाठा ४८.६६% वर, दोन तलाव ओव्हरफ्लो

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जलसाठ्यात वेगाने वाढ होत

Vinayak Raut : विनायक राऊतांच्या अडचणी वाढल्या; २३ जुलैच्या सुनावणीपूर्वी कोर्टाने दिला मोठा झटका

मुंबई : ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सून गिरीजा राऊत (Girija Raut)

Maharashtra Rain Update : पावसाचा दमदार कमबॅक! पुण्यासह 'या' जिल्ह्यांत यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : जुलैच्या सुरुवातीला महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सूनने (Monsoon) दमदार हजेरी लावली होती. मात्र, गेल्या काही