Devendra Fadnavis : आता शाळेत मिळणार 'ड्रग्ज'च्या दुष्परिणामांचे धडे

मख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश; अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजनेबाबत बैठक


मुंबई : शालेय जीवनापासूनच अंमली पदार्थांच्या घातक दुष्परिणामाविषयी विद्यार्थ्यांमध्ये व्यापक जागृती आणण्यासाठी इयत्ता सातवी ते दहावीच्या अभ्यासक्रमामध्ये अंमली पदार्थ दुष्परिणाम विषयक घटकांचा समावेश करण्यात यावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिले. सह्याद्री अतिथिगृह येथे आयोजित 'अंमली पदार्थमुक्त महाराष्ट्र व्यूहरचना आणि कृती योजना' बैठकीत ते बोलत होते. सशक्त महाराष्ट्रासाठी व्यसनमुक्तीच्या या चळवळीत सर्वांचे योगदान आवश्यक असल्याचे सांगत, नैसर्गिक व कृत्रिमरित्या तयार होणाऱ्या अंमली पदार्थांचे उत्पादन, पुरवठा आणि खरेदी-विक्रीच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेला मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.



या उच्चस्तरीय बैठकीला वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, नगर विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, गृह (शहरे) राज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (गृह) मनीषा म्हैसकर, पोलिस महासंचालक सदानंद दाते आणि मुंबईचे पोलिस आयुक्त देवेन भारती उपस्थित होते. नशेच्या चक्रव्यूहातून बाहेर पडण्याची इच्छा असलेल्या नागरिकांसाठी राज्यामध्ये नशामुक्ती केंद्रांची एक मजबूत साखळी उभारण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने तसेच वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य आणि अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या समन्वयातून ही केंद्रे उभारली जातील. मुंबईत महापालिकेने स्वतंत्र बहुशाखीय नशामुक्ती केंद्र सुरू करावे, तसेच राज्यातील सर्व मोठी व शासकीय रुग्णालयांमध्ये काही खाटा या केंद्रांसाठी राखीव ठेवाव्यात, जेणेकरून नशामुक्त झालेली व्यक्ती पुन्हा या गर्तेत जाणार नाही. तसेच शाळा आणि महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी व मुख्याध्यापकांनी पुढाकार घेऊन आपले शैक्षणिक परिसर (Campus) अंमली पदार्थमुक्त घोषित करण्यासाठी कडक नियमावली तयार करावी, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.


अंमली पदार्थ विषयक गुन्ह्यांमध्ये एनडीपीएस सारख्या कडक कायद्यांचा प्रभावी वापर करून खटले वेगाने निकाली काढण्यासाठी जलदगती न्यायालये स्थापन केली जातील. या प्रकरणांमध्ये आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी सरकारी वकिलांचे विशेष प्रशिक्षण घेतले जाईल. अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या छोट्या विक्रेत्यांचा (पेढलर्स) शोध घेऊन त्यांची संपूर्ण पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना दिले. तसेच, या क्षेत्रात गोपनीय माहिती देणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी बक्षीस योजना सुरू केली जाईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना मूळ वेतनाच्या तीन टक्के आगाऊ वेतन, तपास कार्यासाठी आवश्यकतेनुसार विमान प्रवासाची सवलत आणि विशेष पुरस्कार दिले जातील. (Devendra Fadmavis )



पाच वर्षांत हजारो कोटींचे अंमली पदार्थ जप्त


बैठकीत अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्योती प्रिया सिंग यांनी सविस्तर सादरीकरण केले. त्यानुसार, २०२१ ते २०२५ या कालावधीत पोलिसांनी केलेल्या कारवायांमध्ये ६ हजार ५५० कोटी रुपयांचे ५.७ टन मेफेड्रोन जप्त केले आहे. याशिवाय ४८४.७५ कोटींचे हेरॉईन (१३४ किलो), १८६.४४ कोटींचा गांजा (१०९.७ टन), १४.६७ कोटींचे चरस (७५९ किलो) आणि १४.६० कोटींचे कोकेन (१३४ किलो) जप्त करण्यात आले आहे. केवळ २०२५ या एका वर्षात १७ हजार ६११ प्रकरणांमध्ये १ हजार ३४० कोटी रुपये किमतीचे एकूण ५६ हजार २०६ किलो विविध अंमली पदार्थ जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी १५ हजार ९९४ आरोपींना अटक करण्यात आली आहे, ज्यामध्ये ७२ परदेशी नागरिकांचा समावेश आहे.

Comments
Add Comment

MHADA Lottery : म्हाडाच्या दोन हजार ६४० सदनिकांसाठी निघणार सोडत, ७५ हजार १२७ अर्जदारांचे लक्ष

मुंबई : म्हाडा मुंबई (MHADA Mumbai) मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील २,६४० सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत (MHADA

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा मान्सून सक्रिय! पुढील ४ दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा; 'या' जिल्ह्यांना ऑरेंज-यलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम

Anil Kakodkar : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी अनिल काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती

- 'जीएमआरटी' दुर्बिणीवर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणार; ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश मुंबई :

Sindhu Mahakumbh : सिंधू महाकुंभाच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या संदेशाचा महाराष्ट्रात गौरव; राज्यपालांच्या हस्ते इंद्रेश कुमार आणि पाल्गा रिंपोचे यांचा सन्मान

मुंबई : लडाख येथे प्रथमच आयोजित करण्यात आलेल्या सिंधू महाकुंभ (Sindhu Mahakumbh) उपक्रमाने राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक

Analog Paneer : पनीरच्या ३२ टक्के नमुन्यांमध्ये भेसळ, 'ॲनालॉग पनीर'मध्ये वनस्पती चरबीचा वापर

मुंबई : राज्यात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) बाजारपेठेतून घेतलेल्या पनीरच्या नमुन्यांपैकी तब्बल ३२ टक्के नमुने

Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांनी घेतला करंजा मत्स्य बंदर प्रकल्पाचा आढावा

- ४ हजार ५०० मेट्रिक टन मत्स्य उत्पादन हाताळण्याची क्षमता; अत्याधुनिक यंत्रणेसह अनुभवी मनुष्यबळाचा वापर