Bay of Bengal Tragedy : बंगालच्या उपसागरात रोहिंग्यांच्या दोन बोटी उलटल्या; ५०० हून अधिक जण मृत्युमुखी पडल्याची भीती

ढाका/यांगून : म्यानमारमधून पलायन करणाऱ्या रोहिंग्या निर्वासितांवर मोठे संकट कोसळले आहे. बंगालच्या उपसागरात रोहिंग्या निर्वासितांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी खराब हवामानामुळे उलटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत असून, अनेक जण अद्याप बेपत्ता आहेत. संयुक्त राष्ट्रांच्या निर्वासितांसाठीच्या संस्था UNHCR आणि IOM यांनी या घटनेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. (Bay of Bengal Tragedy)


प्राथमिक माहितीनुसार, या दोन्ही बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या पश्चिम राखाइन राज्यातून निघाल्या होत्या. काही प्रवाशांनी बांगलादेश सीमेजवळूनही प्रवास सुरू केला होता. मात्र, बंगालच्या उपसागरात अचानक हवामान बिघडले आणि समुद्रात उंच लाटा उसळल्याने दोन्ही बोटींचा संपर्क तुटला.
संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांच्या माहितीनुसार, पहिल्या बोटीत सुमारे २५० प्रवासी होते. प्रवास सुरू झाल्यानंतर काही वेळातच या बोटीचा संपर्क तुटला. त्यानंतर ८ जुलै रोजी म्यानमारमधील इरावदी किनाऱ्याजवळ सुमारे २८० प्रवाशांना घेऊन जाणारी दुसरी बोटही उलटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन्ही बोटींमधील मिळून ५३० हून अधिक प्रवासी बेपत्ता असून, त्यांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Bay of Bengal Tragedy)



घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू असून, काही मृतदेह हाती लागले आहेत. उर्वरित बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. (Bay of Bengal Tragedy)



दरम्यान, पावसाळ्याच्या काळात बंगालच्या उपसागरात समुद्र अत्यंत खवळलेला असल्याने रोहिंग्या निर्वासितांचा समुद्रमार्गे प्रवास अत्यंत धोकादायक ठरतो. UNHCR आणि IOM यांच्या मते, अलीकडील मुसळधार पाऊस, पूरस्थिती आणि खराब हवामानामुळे या भागातील समुद्री प्रवास अधिकच जोखमीचा बनला आहे. मृतांचा आणि बेपत्ता नागरिकांचा अंतिम आकडा अद्याप अधिकृतरीत्या जाहीर झालेला नसला, तरी ही अलीकडील काळातील सर्वात मोठ्या सागरी दुर्घटनांपैकी एक ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (Bay of Bengal Tragedy)

Comments
Add Comment

Central government plan on LPG LNG : आता हे काय नवीन ? एलपीजी अन् एलएनजीच्या आपत्कालीन साठ्यासाठी ग्राहकांवर कर ? केंद्र सरकारचा मोठा प्लॅन

भारतातील ऊर्जा संकट टाळण्यासाठी आणि इंधनाचा आपत्कालीन साठा निर्माण करण्यासाठी केंद्र सरकार ४२ अब्ज डॉलर

Central Government Operation Trishul : मोदी सरकारची मोठी कारवाई! 7 वर्षांत 36 देशांतून 274 फरार गुन्हेगार भारतात परत; 'ऑपरेशन त्रिशूल'ने वाढवली तपास यंत्रणांची ताकद

नवी दिल्ली : देशातून पळून गेलेल्या फरार गुन्हेगारांविरोधात केंद्र सरकारने मोठी मोहीम हाती घेतली असून, 2019 ते 2026 या

Mark Zuckerberg Apology : मेटाला PM मोदींचा व्हिडिओ हटवणे भोवले; केंद्र सरकार आक्रमक, झुकरबर्ग यांनी मागितली माफी

NEET परीक्षा पेपर लीक प्रकरणी दिल्लीतील जंतरमंतर येथे देशभरातून आंदोलनाचा भडका उडाला होता. या गंभीर पार्श्वभूमीवर

Foreigners Banned In Indian City : इंग्रजांनी वसवलेलं 'हे' निसर्गरम्य शहर; पण आज तिथेच परदेशी पर्यटकांना बंदी का ? कारण काय ?

देवभूमी म्हणून ओळखले जाणारे उत्तराखंड हे राज्य आपल्या निसर्गरम्य दऱ्या, शांत पर्वत आणि अप्रतिम निसर्ग

Dabur India FSSAI action : डाबर इंडियाला FSSAI चा मोठा दणका! ‘१००% शुद्धतेचे’ दावे करणाऱ्या मध, तुपासह अनेक उत्पादनांच्या विक्रीवर बंदी

नवी दिल्ली : ग्राहकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती आणि दाव्यांविरोधात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक

Mark Zuckerberg : पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ काढणं मेटाला महागात पडणार? मार्क झुकरबर्गना संसदीय समितीचा ३ दिवसांचा अल्टिमेटम; “माफी मागा अन्यथा…”

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा एक महत्त्वाचा व्हिडिओ काही तासांसाठी फेसबुकवरून (Facebook)