मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने (Rain) काहीशी उघडीप घेतली असली तरी आता पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आज १५ जुलै २०२६ रोजी सकाळी ७ वाजता जारी केलेल्या 'नाऊकास्ट वॉर्निंग' (Nowcast Warning) नुसार, पुढील ३ तासांत पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील काही ठिकाणी हलका पाऊस (Light Rain) पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert) जारी करण्यात आला असून नागरिकांना आवश्यक ती खबरदारी (Precautions) घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, दिवसभरात राज्यातील अनेक भागांतही हवामानात (Weather) बदल होण्याची शक्यता आहे. काही जिल्ह्यांत वादळी वारे (Thunderstorm Winds), विजांचा कडकडाट (Lightning) आणि हलका ते मध्यम पाऊस (Light to Moderate Rain) पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट (Yellow Alert)
ठाणे, रायगड, नाशिक घाटमाथा, अहिल्यानगर, पुणे घाटमाथा, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या भागांसाठी विजांच्या कडकडाटासह (Lightning) व वादळी वाऱ्यांसह (Thunderstorm) हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कचरा खासगीकरणाचा प्रस्ताव दोनदा फेटाळल्यानंतर प्रशासनाने घेतली भूमिका Byculla : एफ उत्तर, एफ दक्षिण आणि ई विभागातील कचरा खासगीकरणाचा प्रस्ताव सलग दोन ...
या भागांतही पावसाची शक्यता
पालघरमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे. मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्येही वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर येथे हलक्या पावसाचा अंदाज असून, पुणे, कोल्हापूर घाटमाथा आणि सातारा घाटमाथा येथे वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांतही हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.
विदर्भात कोरडे वातावरण
अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांत आज बहुतांश ठिकाणी कोरडे वातावरण (Dry Weather) राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी
चेंबूर घटनेनंतर चौकशी समितीने सूचवल्या शिफारशी Mumbai: मुंबईत झाडांची दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आता चौकशी समितीने काही शिफारस केल्या असून यामध्ये ...
गेल्या काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्यामुळे खरीप (Kharif) पिकांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, आता राज्यातील बहुतांश भागांत हलका ते मध्यम पाऊस होण्याचा अंदाज असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.




