मुंबई: राज्यात मागील काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले असून बाजारात आवक घटल्याने भाजीपाल्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. पावसानंतर मागणी वाढल्याने अनेक भाज्यांचे भाव दुप्पट झाले असून सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. (Vegetable Price Hike)
जून महिन्यात पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने भाजीपाला पिकवला होता. मात्र जुलैच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसामुळे शेतात पाणी साचून अनेक पिकांचे नुकसान झाले. परिणामी बाजारात पुरवठा कमी झाला आणि दर वाढले. (Maharashtra Vegetable Price)
Nashik Accident : येवला-नांदगाव मार्गावर (Yeola-Nandgaon Highway) भीषण अपघाताची घटना घडली आहे. येवला-नांदगाव मार्गावरील सोमठाणे घाटात आज (मंगळवारी) सकाळी मध्य प्रदेशातील एक ...
भाजीपाल्याचे नवे दर (प्रति किलो):
- फरसबी : ₹१००-१२० वरून ₹१८०-२००
- वाटाणा : ₹१६०-१८० वरून ₹२२०-२४०
- शेवग्याच्या शेंगा : ₹६०-८० वरून ₹१००-१६०
- ढोबळी मिरची : ₹३५-४५ वरून ₹८०-१००
- गवार : ₹२०-३० वरून ₹८०-१२०
- आलं : ₹१५०-१८० वरून ₹२००-२८०
दरम्यान, नाशिक बाजार समितीत कोथिंबिरीच्या दराने विक्रमी उसळी घेतली असून एका जुडीला ₹२१० पर्यंत भाव मिळत आहे. मुंबई, सुरत, अहमदाबादसह इतर शहरांमधून वाढलेल्या मागणीमुळे कोथिंबिरीसह पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. ( Agriculture News)
- ठाणे-पनवेलसह 'या' शहरांचा समावेश मुंबई : स्वतःच्या हक्काच्या घराची वाट पाहणाऱ्या लाखो नागरिकांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडाच्या कोकण ...
मेथी, पालक, वांगी, फ्लॉवर, कोबी आणि शेवग्याच्या शेंगांचे दरही दुपटीने वाढले आहेत. तज्ज्ञांच्या मते, पिकांचे झालेले नुकसान आणि मर्यादित पुरवठा यामुळे पुढील १५ दिवस तरी भाजीपाल्याचे दर उच्च पातळीवर राहण्याची शक्यता आहे.






