मुंबई : राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना लाभ देणारी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना' लागू केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यातील शेतकऱ्यांतर्फे 15 जुलै रोजी जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम नरिमन पॉईंट येथील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे सकाळी 11 ते दुपारी 3 या वेळेत होणार असून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. (Devendra Fadnavis)
- मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय; राज्यातील शेतमाल निर्यातीला मोठी चालना मिळणार मुंबई : पालघर जिल्ह्यात विकसित होत असलेल्या 'वाढवण बंदरा'ला जोडून दापचरी ...
विधानसभेतील अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत 50 हजार रुपयांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांवरील मर्यादा हटवून त्यांनाही 2 लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 2026-27 मध्ये कर्ज घेऊन वेळेत परतफेड करण्याची अटही रद्द करण्यात आली. (Maharashtra Farmer Loan Waiver)
सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील सुमारे 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार 585 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. यापूर्वी दोन लाख रुपयांपेक्षा जास्त थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळत नव्हता. मात्र, नव्या योजनेनुसार अशा शेतकऱ्यांनाही दोन लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जाणार आहे. (Punyashlok Ahilyadevi Holkar Scheme)
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (Nationalist Congress Party) ज्येष्ठ नेते तथा अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) ...
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोणताही पात्र शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहू नये, ही सरकारची भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. या निर्णयामुळे राज्यावर अतिरिक्त आर्थिक भार पडणार असला तरी शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. (BJP Maharashtra)
या ऐतिहासिक निर्णयाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी राज्यभरातील शेतकऱ्यांनी 15 जुलै रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सत्काराचे आयोजन केले आहे.




