Nashik : नाशिकच्या कांदा बाजारात रोकड टंचाईचे संकट; शेतकऱ्यांच्या देयकांना विलंब

Nashik : नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजारात (Onion Market) सध्या रोकड टंचाईचे गंभीर संकट निर्माण झाले असल्याचे चित्र आहे आणि याचाच थेट फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना (Onion-growing farmers) बसत आहे. बँकांकडून व्यापाऱ्यांना आवश्यक तेवढी रोख रक्कम वेळेत उपलब्ध होत नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील (Agricultural Produce Market Committees) व्यवहारांवर आता याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी, शेतकऱ्यांनी विकलेल्या कांद्याचे पैसे नियमानुसार २४ तासांच्या आत मिळण्याऐवजी अनेक तासांचा, तर काही ठिकाणी त्याहून अधिक विलंब होत असल्याची तक्रार महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने (State Onion Growers' Association) केली आहे.



रोकड उपलब्ध होत नसल्याने व्यवहारांची गती मंदावली


देवळा तालुक्यात सध्या कांद्याला समाधानकारकी असा बाजारभाव मिळत आहे. देवळा तालुक्यात दोन खासगी आणि दोन शासकीय अशा एकूण चार कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये रोजच मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात मात्र, व्यापाऱ्यांना बँकांकडून वेळेवर रोकड उपलब्ध होत नसल्याने व्यवहारांची गती मंदावली आहे ज्याचा थेट शेतकऱ्यांच्या आर्थिक व्यवहारांवर बसत आहे. परिणामी शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.


या गंभीर प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या शिष्टमंडळाने अध्यक्ष भारत दिघोळे (Bharat Dighole) यांच्या मार्गदर्शनाखाली देवळ्याचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांची भेट घेत निवेदन सादर केले. व्यापाऱ्यांना आवश्यक निधी वेळेत उपलब्ध करून देण्यात यावा आणि शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचे पैसे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नियमानुसार २४ तासांच्या आत मिळावेत, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.



...अन लिलावातील स्पर्धा कमी


संघटनेच्या म्हणण्यानुसार, जर कांडा बाजारात सकाळी सुमारे १० वाजता लिलाव झाला तरी त्याचे पैसे अनेकदा संध्याकाळपर्यंत देखील मिळत नाहीत. काही व्यापाऱ्यांकडे आवश्यक रोख उपलब्ध नसल्यामुळे ते लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याचेही टाळतात. त्यामुळे लिलावातील स्पर्धा कमी होत असून त्याचा परिणाम कांद्याच्या बाजारभावावर होत आहे. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल सुमारे १०० ते २०० रुपयांपर्यंत आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचा दावा संघटनेने केला आहे. विशेषतः खासगी बाजार समित्यांमध्ये ही समस्या अधिक तीव्र असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


संघटनेने प्रशासनाकडे संबंधित बँकांच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेऊन व्यापाऱ्यांना आवश्यक निधी आणि रोख रक्कम वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. संघटनेचे नाशिक जिल्हा समन्वयक भगवान जाधव यांनी, मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याची विक्री झाल्यानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे पैसे मिळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याचे सांगितले.



संघटनेचे जिल्हाध्यक्ष जयदीप भदाणे यांनी शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे २४ तासांच्या आत मिळणे हा त्यांचा कायदेशीर अधिकार असल्याचे स्पष्ट करत प्रशासनाने या प्रश्नात तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. व्यापाऱ्यांना वेळेत रोकड उपलब्ध झाल्यास अधिक व्यापारी लिलावात सहभागी होतील, स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना त्यांच्या कांद्याला अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी