Shrirampur : जेवणाच्या ऑर्डरवरील किरकोळ वादातून हॉटेल व्यावसायिकाचा खून; 'त्या' अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलिसांचे आवाहन

Shrirampur : श्रीरामपूर शहरात काही दिवसांपूर्वी घडलेल्या हॉटेल व्यावसायिकाच्या खूनप्रकरणाचा उलगडा करत पोलिसांनी शहरात सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. या हत्येमागे मुंबईहून आलेल्या आरोपींचा किंवा कोणत्याही टोळीचा सहभाग नसल्याचे सांगत हा प्रकार केवळ जेवणाच्या ऑर्डरवरून झालेल्या किरकोळ वादाचे पर्यवसान असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. (Shrirampur News)



तीन आरोपी ताब्यात


शहरात या घटनेबाबत अफवा वाढल्याने या प्रकरणाची सविस्तर माहिती देण्यासाठी पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर (Jayadatta Bhavar) यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत याबाबत माहिती दिली. तपासाच्या प्रत्येक पैलूची माहिती देताना त्यांनी सांगितले की, या गुन्ह्यात केवळ तीन आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला असून तिघांनाही अटक करण्यात आली आहे. सुरुवातीच्या तपासात संशयाच्या भोवऱ्यात आलेल्या अन्य दोन व्यक्तींचा या गुन्ह्याशी कोणताही संबंध आढळून आलेला नाही. त्यामुळे त्यांच्याबाबत सुरू असलेल्या चर्चांना कोणताही तथ्याधार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Shrirampur News)



किरकोळ वाद क्षणांतच विकोपाला


तपासादरम्यान घटनास्थळावरील पुरावे, सीसीटीव्ही फुटेज, साक्षीदारांचे जबाब आणि अन्य तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण घटनाक्रम उलगडला. या हत्येमध्ये कोणत्याही प्रकारच्या धारदार किंवा घातक हत्याराचा वापर करण्यात आलेला नसल्याचे तपासातून समोर आले असून पोलिसांच्या तपासानुसार, जेवणाच्या ऑर्डरवरून झालेला किरकोळ वाद काही क्षणांतच विकोपाला गेला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. याच वादातून हॉटेल व्यावसायिकाचा मृत्यू झाला. त्यामुळे या गुन्ह्यामागे टोळीयुद्ध, बाहेरील गुन्हेगार किंवा पूर्वनियोजित कट असल्याच्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांना कोणताही आधार नसल्याचे पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी स्पष्ट केले. (Shrirampur News)



आरोपींविरुद्ध यापूर्वीही गुन्हे


या प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेश जाधव (Suresh Jadhav) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरुद्ध यापूर्वीही गुन्हे दाखल असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच दुसरा आरोपी यश जाधव (Yash Jadhav) याच्याविरुद्धही यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. दरम्यान, शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी श्रीरामपूर पोलिसांनी (Shrirampur Police) विशेष मोहीम सुरू केली आहे. सोमवारी विना क्रमांकाच्या वाहनांवर विशेष कारवाई करण्यात आली असून अनेक वाहने जप्त करण्यात आली. तसेच सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालण्याचे काम सुरू असल्याची माहितीही पोलीस प्रशासनाने दिली. (Shrirampur News)



अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन


पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर यांनी नागरिकांना अफवांपासून दूर राहण्याचे आवाहन करत, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या अप्रमाणित माहितीवर विश्वास ठेवू नये, असे सांगितले. कोणत्याही गुन्ह्याबाबत अधिकृत माहिती पोलिसांकडूनच घेण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच या प्रकरणाचा तपास वेगाने आणि पारदर्शक पद्धतीने सुरू असून दोषींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असेही त्यांनी सांगितले आहे.

Comments
Add Comment

Rain Update : 'पश्चिमी विक्षोभा'मुळे देशभरात मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अनेक राज्यांना सतर्कतेचा इशारा

नवी दिल्ली : हवामान विभागाने देशभरात आठवडाभर मान्सून सक्रिय राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर भारतातील

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Chandrashekhar Bawankule : आमचा 'शेर' महाराष्ट्रात प्रचंड ताकद निर्माण करतोय!

- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून मंत्री नितेश राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार - नितेश राणे

Bank Election : परभणी बँकेच्या सत्तेत मोठा उलटफेर! १४ वर्षांनंतर चित्र बदलले, दिग्गजांना मागे टाकत बोर्डीकर पुन्हा सत्ताधीश!

परभणी: राजकीय वर्तुळात अनेकदा "वेळ प्रत्येकाची येते" असे म्हटले जाते, आणि परभणी-हिंगोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी