BMC : झाडांच्या छाटणी कंत्राट कामावरून उद्यान विभागाची मनसेने काढली सालटी

मुंबई (विशेष प्रतिनिधी)


मुंबई महापालिकेत मागील काही दिवसांमध्ये झाडांची पडझड सुरु असून वारंवारच्या झाडांच्या दुर्घटनांना महापालिका उद्यान अधिक्षकच जबाबदार असल्याचा आरोप मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी केला. ट्री टेक नावाच्या कंपनीने मुंबईतील झाडांचा शास्त्रोक्त सर्वे करून देण्याची तयारी दर्शवली होती. या कंपनीने महापालिका तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही पत्र दिले होते. पण उद्यान अधिक्षकांनी मुख्यमंत्र्यांच्या पत्राचीही दखल घेतली नाही. त्यामुळे आजही दुघर्टना घडलेली असून आता नव्याने काढण्यात येणाऱ्या निविदेत झाडांच्या फांद्यांच्या छाटणीमध्ये आतून पोखरलेल्या झाडांमध्ये सिमेंट काँक्रिट, पॉलिथिन फोम आदी भरण्याची शिफारस केली. त्यामुळे उद्यान अधिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी मनसेने या विभागाची सालटीच काढली आहे. (BMC)



मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी महापालिका मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांच्यासह पत्रकार परिषद घेवूनही ही मागणी करताना महापालिकेच्या उद्यान विभागाचे अधिकारी पिऊन काम करत असल्याचा आरोप केला. देशपांडे यांनी पत्रकार परिषदेच्या सुरुवातीलाच महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी ही पत्रकार परिषद नसून जे अधिकारी महाराष्ट्राला बदनाम करु इच्छितात त्यांना सुतासारखे करण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे सांगितले. ट्री टेक या कंपनीने डिसेंबर २०२४ मध्ये महापालिका उद्यान विभागाचे उद्यान अधिक्षक यांना पत्र लिहून सर्वे करण्याची तयारी दर्शवली होती. पण या पत्रावर अधिक्षक बसून राहिले.त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस यांनाही पत्र दिले. त्यांनी तत्कालिन आयुक्तांना पत्र पाठवले. त्यावर डू दी निडफुल असा शेरा मारला होता. पण त्यानंतरही उद्यान अधिक्षकांनी त्यावर कोणतीही कार्यवाही केली नाही. (BMC)


आता ही दुर्घटना घडल्यानंतर पाच हजार झाडांचा सर्वे उद्यान विभागाच्यावतीने एच पश्चिम विभागातील 'स्माईल' स्टार्टअप अंतर्गत देण्यात आले. त्यानंतर हा निधी कमी पडल्यामुळे उपनगराचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी डिपिडीसीचा निधी वाढवून दिला. ही कंपनी झाडांचे स्कॅनिंग करून कुठले झाड आतून खराब झाले आहे, कुठल्या झाडांची मुळे कुमकुवत झाली आहे. झाडांचे आयुर्मान किती? कोणती झाडे कापली पाहिजे? कोणत्या झाडांच्या कुठल्या फांद्या कापल्या गेल्या पाहिजे आदींची माहिती या तपासणी सर्वे अहवालातून समोर येणार आहे. त्यामुळे तेव्हापासून जर हा सर्वे झाला असता आज अनेक झाडे वाचू शकली असती आणि दुर्घटना होवून लोकांचे जीव गेले नसते असे देशपांडे यांनी सांगितले. (BMC)



आता जुन्या कंत्राटदारांचा कालावधी संपुष्टात आल्यामुळे नव्याने निविदा मागण्यात आल्या आहेत. यामध्ये हॉर्टीकल्चर बंधनकारक केला असून वृक्ष संगोपन तज्ज्ञ तथा आरबोर्रिस्ट कल्चर यांचा कुठेही उल्लेख नाही. यापेक्षा भयानक म्हणजे जी झाडे पोखरलेली असतील, त्यात पोकळी निर्माण झाली असतील तर त्यामध्ये सिमेंट काँक्रीट टाकले जावे, पॉलिथिन फोम आदींचा उपयोग करण्याची नमुद केले आहे. त्यामुळे उद्यान विभाग नक्की झाडे वाचवण्याचा प्रयत्न करते की मारण्याचा प्रयत्न करते असा सवाल उपस्थित करत अशा उद्यान अधिक्षकांना तात्काळ हटवले गेले पाहिजे अशी मागणी केली. (BMC)

Comments
Add Comment

FYJC : अकरावी प्रवेशासाठी मंगळवार ४ ऑगस्टपासून विशेष फेरी

मुंबई : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठीच्या इयत्ता अकरावी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंत १५ लाखांहून

Devendra Fadnavis : राष्ट्रीय स्तरावर शालेय शिक्षणात महाराष्ट्राचे महत्त्वपूर्ण स्थान; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

राज्यातील शालेय शिक्षण क्षेत्रात अभिनव उपक्रमांची अंमलबजावणी https://prahaar.in/2026/08/03/promotion-for-18-officers-of-the-legislature-secretariat/ शालेय

Mumbai Metro : मेट्रो -६ प्रकल्पाचे ८८ टक्के काम पूर्ण, कारशेडचा प्रश्न कायम

मुंबई : स्वामी समर्थ नगर-जोगेश्वरी-विक्रोळी मेट्रो-६चे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असले तरी कांजुरमार्ग कारशेडचा

Sumantrao Pendharkar : 'विको'ला जागतिक ओळख देणारे उद्योगरत्न सुमंतराव पेंढरकर यांचे निधन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

मुंबई : प्रसिद्ध आयुर्वेदिक उत्पादन कंपनी 'विको लॅबोरेटरीज'ला जागतिक स्तरावर ओळख मिळवून देणारे उद्योगपती आणि

Maharashtra Vidhan Bhavan : विधान मंडळ सचिवालयातील १८ अधिकाऱ्यांना पदोन्नती

मुंबई : महाराष्ट्र विधान मंडळ सचिवालयातील उपसचिव, अवर सचिव, अवर सचिव (समिती) आणि कक्ष अधिकारी अशा एकूण १८ पदांवर

Mohan Bhagwat : सरसंघचालक मुंबईत साधणार 'जेन-झीं'शी संवाद

मुंबई : देशातील तरुण पिढी सध्या लोकशाही, नेतृत्व आणि राष्ट्रउभारणीसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर सक्रियपणे