Nashik News : विठूरायाची भेट अपूर्णच राहिली ! संत निवृत्तीनाथ महाराज पालखीतील महिलेचे निधन

Nashik News : एक ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पालखी (Sant Nivruttinath Maharaj Palkhi) सोहळ्यात त्र्यंबकेश्वरहून (Trimbakeshwar) सहभागी झालेल्या एका वृद्ध वारकरी महिलेचे आज (सोमवारी) पहाटे अहिल्यानगर येथे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे दुःखद निधन झाले. सुमनबाई मधुकर कांडेकर (वय ६५, सध्या रा. तळेगाव अंजनेरी, ता. त्र्यंबकेश्वर) असे या मृत वारकरी माऊलीचे नाव आहे. विठुरायाच्या भेटीआधीच मरण पदराशी आल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, संत निवृत्तीनाथ महाराज दिंडी सोहळा सध्या अहिल्यानगर जिल्ह्यात (Ahilyanagar District) मार्गक्रमण करत आहे. या वारीत त्र्यंबकेश्वरहून सुमनबाई मधुकर कांडेकर या सहभागी झाल्या होत्या. वारीच्या आनंदात विठुरायाच्या भेटीसाठी ही पावले पुढे चालत होती. मात्र मुक्कामासाठी थांबलेल्या सुमनबाई यांना सोमवारी (दि.१३) रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास झोपेतच हृदयविकाराचा झटका आला. यानंतर त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेच्या मदतीने अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासणी अंती त्यांना मृत घोषित केले.



घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून घटनेची माहिती मिळताच संत निवृत्तीनाथ महाराज संस्थानचे अध्यक्ष राहुल महाराज साळुंखे आणि विश्वस्त नवनाथ गांगुर्डे यांनी तात्काळ अहिल्यानगरच्या शासकीय रुग्णालयात धाव घेतली. त्यांनी तेथील परिस्थितीची पाहणी करत पुढील आवश्यक बाबींसाठी मदत केली. यानंतर रुग्णालयात कायदेशीर प्रक्रियेनुसार त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर त्याचा मृतदेह (Dead Body) त्यांच्या गावाकडे पाठविण्यात आला आहे.


विठुरायाच्या भेटीआधीच काळाने अशाप्रकारे त्यांना हिरावून घेतल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती कुटुंबियांना मिळताच त्यांनाही मोठा धक्का बसला. घटनेमुळे कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.


 
Comments
Add Comment

Maharashtra Rain : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, पुढील तीन दिवस सतर्कतेचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून पुढील तीन दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची

Nitesh Rane : कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव पालकमंत्री नितेश राणेंनी घेतला चहा-भजीचा आस्वाद

मसूरे : सत्तेच्या पदांचा किंवा प्रोटोकॉलचा कोणताही अभिनिवेश न बाळगता जनतेत मिसळणे, कार्यकर्त्यांच्या

Friendship Day 2026 Special : मैत्रीची अनोखी कहाणी सांगणारे बॉलीवूडचे 'हे' सुपरहिट चित्रपट, एकदा नक्की पाहाच!

मुंबई : मैत्री म्हणजे विश्वास, साथ, त्याग आणि आयुष्यभर जपला जाणारा नात्याचा धागा. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या

Jasprit Bumrah : बुमराह श्रीलंका दौऱ्याला मुकणार ? दुखापतीमुळे निवड समितीसमोर पर्यायांचा प्रश्न

नवी दिल्ली : भारताचा आघाडीचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) १५ ऑगस्टपासून गाले येथे सुरू होणाऱ्या

Supreme Court : व्यभिचार सिद्ध झाल्यास पत्नी पोटगीस अपात्र, सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल

नवी दिल्ली : पत्नी व्यभिचारात राहत असल्याचे पतीकडून स्पष्टपणे सिद्ध झाल्यास, फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १२५

India Envoy Warns Pakistan : "आधी दहशतवाद संपवा, आणि नंतरच..."!पाकिस्तानला भारताचा कडक इशारा; राजदूत विनय क्वात्रा यांचे स्पष्ट शब्द

नवी दिल्ली : पाकिस्तानने द्विपक्षीय संबंध सुधारायचे असतील, तर सर्वप्रथम आपल्या भूमीवरील दहशतवादाचा संपूर्ण